पीक विमा कंपन्यांनी पन्नास हजार कोटी कमावले हा घोटाळाच – राजू शेट्टी

पीक विमा कंपन्यांनी पन्नास हजार कोटी कमावले हा घोटाळाच – राजू शेट्टी

आपत्ती येऊनही पीक विमा कंपन्यांनी पन्नास हजार कोटी रुपये कमावले, हा घोटाळाच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.

शेतीवर अनेक आपत्ती येवूनही विमा पंपन्यांनी तब्बल पन्नास हजार कोटी रुपये कमविले, यातूनच या विमा कंपन्यांची खरी परिस्थिती समोर येत आहे. मागील काळात खोटे रेकॉर्ड तयार करून पीक विमा काढण्यात आला, त्याप्रकरणी अधिकारी निलंबित करण्यात आले. मात्र, पुढील कारवाई झालीच नाही. याचाच अर्थ सरकार या कंपन्यांना पाठीशी घालत आहे. या कंपन्यांच्या कारभाराला सरकारच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. वाहन अपघाताप्रमाणे शेतकऱयांना पीक विम्याची भरपाई मिळावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.

उसने पैसे सरकारने दिले तरी जिल्हा बँक जिवंत राहतील. उद्योगांना कर्ज माफ केले, पण शेतकऱयांना मदत केली नाही, असेही ते म्हणाले. सरकारने आमदारांच्या सुरक्षेसाठी एक हजार कोटी रुपये खर्च केले, त्याची आकडेवारी जाहीर करावी, घोषणेप्रमाणे सातबारा उतारा कोरा करावा. नाफेड कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे, नाफेडने खुल्या बाजारात खरेदी करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुष्पा 2 च्या  ब्लॉकबस्टर यशानंतर सुपरस्टार झालास, आता नवी ओळख काय असेल? पाहा अल्लू अर्जुन काय म्हणाला? पुष्पा 2 च्या ब्लॉकबस्टर यशानंतर सुपरस्टार झालास, आता नवी ओळख काय असेल? पाहा अल्लू अर्जुन काय म्हणाला?
पुष्पा पार्ट 1 आणि पुष्पा पार्ट 2 या दोन्ही चित्रपटांनी अभिनेता अल्लू अर्जुनला एक वेगळी ओळख मिळून दिली. या चित्रपटांमुळे...
मैं झुकेगा नहीं साला…पुष्पाच्या या जगप्रसिद्ध डायलॉग मागे कोण? अल्लु अर्जुन याने सांगितले
Allu Arjun In Waves Summit 2025 : सिक्स पॅक करण्यासाठी हिरोईनकडून घेतली प्रेरणा, अल्लू अर्जुननं सांगितलं फिटनेसचं महत्त्व!
WAVES 2025: भारत डिजिटल क्रांतीचे…; श्रद्धा कपूरने घेतली इंस्टाग्राम प्रमुखांची भेट
Blue Tea : हृदयविकार असलेल्यांनी ब्लू टी प्यायल्यास काय होतं? जाणून घ्या
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची मुलगी शांताबाई साठे यांचे निधन
मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल