आवास योजनेपासून गरिबांना दूर ठेवण्याचे षडयंत्र, ग्रामसेवकांचा गलथानपणा; जामखेडमधील 25 गावांत एकही ऑनलाइन नोंद नाही

आवास योजनेपासून गरिबांना दूर ठेवण्याचे षडयंत्र, ग्रामसेवकांचा गलथानपणा; जामखेडमधील 25 गावांत एकही ऑनलाइन नोंद नाही

गटविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांनी पंतप्रधान आवास योजनेकडे दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील 25 गावांमध्ये एकही ऑनलाइन आवास योजनेची नोंद झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक गरीब कुटुंबांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र अधिकारी, पदाधिकारी करत असल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी गावात एकाही घरकुलाची नोंद झालेली नाही. यावरून गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांचा गलथान कारभार समोर आला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षण मोहिमेवर जामखेड तालुक्यातील ग्रामसेवकांच्या गलथानपणाचा मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील तब्बल 25 ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी या सर्वेक्षणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचे स्वप्न अधांतरी राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ सरकारी फाईलपुरती मर्यादित राहणार का, असा सवाल आता गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.

जामखेड तालुक्यात हजारो कुटुंबं घरकुल योजनेसाठी पात्र असताना, 30 एप्रिलपर्यंत फक्त 1 हजार 751 लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील 1 हजार 11 लाभार्थ्यांनी आपली नोंदणी सेल्फ सर्व्ह म्हणजे (लाभार्थ्यांनी स्वतः च्या मोबाईलवरून केलेले सव्र्व्ह), तर ग्रामसेवकांच्या आयडीवरून फक्त 740 नोंदणी झाली आहे. यावरून या योजनेबाबत प्रशासन किती गांभीर्य असल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे अपुरे संख्याबळ असल्याने नोंदणी करताना सुरुवातीला अडचण झाली. आवास योजना ऑनलाइन करताना ग्रामसेवकाचा मोबाईल व तो अधिकारी स्वतः त्या ठिकाणी हजर असावा लागतो. त्यामुळे आवास योजनेच्या नोंदणीत वेळ वाया गेला. त्यामुळे लाभार्थ्यांची नोंदणी करता आली नाही. ज्या गावात एकाही घरकुलाची नोंदणी झाली नाही, त्या गावात प्राधान्याने नोंदणी पूर्ण करणार असल्याचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी सांगितले.

या गावांत एकही नोंद नाही

आगी, आनंदवाडी, आपटी, अरणगाव, चौंडी, देवदैठण, धनेगाव, धामणगाव, डोणगाव, हळगाव, जायभायवाडी, कवडगाव, मतेवाडी, खर्डा, मोहा, मोहरी, मुंजेवाडी, नाहुली, नायगाव, पाटोदा, साकत, सातेफळ, शिऊर, वाकी, नान्नज या २५ गावांत पंतप्रधान आवास योजनेची एकही नोंद झाली नाही. त्यामुळे ही गावे घरकुल योजनेपासून वंचित राहिली आहेत.

केवळ 740 लाभार्थ्यांची नोंदणी

तालुक्यातील अपात्र 5 हजार दोनशे लाभार्थी असताना त्यापैकी फक्त 740 लाभार्थी ऑनलाइन झाले आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांकडे हा सर्वे असताना देखील त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.

आणखी 15 दिवसांची मुदतवाढ

केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजनेला 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा प्रधानमंत्री आवास नोंदणी करण्यात अवधी मिळाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अभिनेत्रीने तिच्या 16 वर्षांच्या लेकीला दिला ‘ते’ टॉय वापरण्याचा सल्ला; कारण जाणून आश्चर्य वाटेल अभिनेत्रीने तिच्या 16 वर्षांच्या लेकीला दिला ‘ते’ टॉय वापरण्याचा सल्ला; कारण जाणून आश्चर्य वाटेल
बॉलिवूड असो किंवा टेलिव्हिजन सेलिब्रिटी कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतातच. आता अशीच एक अभिनेत्री आहे जी अशाच एका विधानामुळे चर्चेत...
‘त्याने माझ्या पँटमध्ये हात घातला…’, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
तुम्ही सुद्धा ‘Sugarfree Diet’ करताय? आरोग्यावर ‘हे’ गंभीर परिणाम दिसून येतील….
हिंदुस्थानी संरक्षण दलाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांनी आभाळातून पैसे आणायचे का? हसन मुश्रीफ संजय शिरसाटांवर भडकले
Jalana: बदनापूर तालुक्याला अवकाळीने झोडपले; गारपीटचा मार, लग्नाचा मंडप हवेने उडाला, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आग, भाविकांमध्ये घबराट