Jalana: बदनापूर तालुक्याला अवकाळीने झोडपले; गारपीटचा मार, लग्नाचा मंडप हवेने उडाला, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

Jalana: बदनापूर तालुक्याला अवकाळीने झोडपले; गारपीटचा मार, लग्नाचा मंडप हवेने उडाला, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. आज 5 मे रोजी दुपारनंतर अचानक जोरदार वादळी पावसासह गारपीटने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान केले. जोरदार हवेने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर गारपीट व हवेच्या प्रचंड लोटाने गेवराई येथील विवाह समारंभाचा मंडप उडून प्रचंड नुकसान झाले. कर्जमाफीचे आश्वासन तोडून सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आज अस्मानी संकटाच्या माऱ्याने त्यांच्या उत्पन्न वाढीच्या उरल्या सुरल्या आशाही मातीमोल केल्या अशा भावना आता व्यक्त होऊ लागल्या आहेत.

बदनापूर तालुक्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा यापूर्वीच अंदाज वर्तवला होता. बदनापूर तालक्यातील गेवराई बाजार, वाल्हा, कंडारी, अकोला, निकळक, सोमठाणा, गोकूळवाडी सह अने मंडळात गारपीट झाल्याने भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान झाले. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोंगणी करून मळणीसाठी उन्हाळी मका, बाजरी, ज्वारी पिके एकत्रित करून ठेवलेली होती ती पूर्णपणे भिजून त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक पीक जमीन दोस्त झाले. या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. बदनापूर तालुक्यात अंबा पिकाचे मोठे उत्पादन आहे. मात्र, यंदा उन्हाच्या प्रचंड तडाख्याने दर वर्षीपेक्षा हे झाडांना कमी आंबे लगडलेले होते. मात्र, आजच्या गारपीटने उरले सुरले आंबेही पडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. भाजीपाला, नुकतीच लावलेली मिरची, टॉमेटो आदी पिकांचेही नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मार्फी देण्यात येईल असे आश्वासन सत्तेत येण्यापूर्वी देण्यात आलेले असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सरकारवर तालुक्यात प्रचंड रोष असताना मोठया आशेने फळबागा व भाज्या, पालेभाज्याच्या उत्पादनावर अंवलबून असलेला शेतकरी या आस्मानी संकटाने पूर्णपणे खचला आहे.

गेवराई बाजार येथील ज्ञानेश्वर रामभाऊ जोशी यांनी आपली भाची पूजा लोहकरे हिचा विवाह गेवराई बाजार येथे आयोजित केला होता. 5 मे रोजी दुपारी होणाऱ्या या विवाह सोहळयासाठी प्रचंड तयारी करण्यात येऊन मोठा मंडप लावण्यात आलेला होता. जवळपास 2 हजार व्यक्तींच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. प्रचंड गारपीट व जोरदार वाऱ्यामुळे मंडप उडून जाऊन या विवाह सोहळयात अडचण येऊन सर्व व्यवस्था मातीमोल झाल्याने जोशी कुटुंबियांना संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्याच्या झालेल्या प्रचंड नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;