बीएसएफमध्ये लवकरच 16 नवीन बटालियन, दोन हेडक्वॉर्टरला मंजूरी; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

बीएसएफमध्ये लवकरच 16 नवीन बटालियन, दोन हेडक्वॉर्टरला मंजूरी; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास तसेच दोन नवीन हेडक्वार्टर स्थापन करण्यास केंद्राने मंजूरी दिली आहे. नवीन बटालियनमध्ये सुमारे 17,000 जवान असतील. या निर्णयामुळे वाढत्या सुरक्षा आव्हानांना आणि सीमेवरील दक्षतेला बळकटी मिळेल.

पाकिस्तान आणि बांगलादेश सीमांवर देखरेख करण्यासाठी त्यांच्या पश्चिम आणि पूर्व कमांडसाठी दोन नवीन फॉरवर्ड मुख्यालये स्थापन करण्याची योजना आहे. एक मुख्यालय जम्मूमध्ये असेल जम्मूमध्ये जे जम्मू आणि पंजाबमधील हिंदुस्थान-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेची सुरक्षा मजबूत करेल. दुसरीकडे, बांगलादेश सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी मिझोरममध्ये एक मुख्यालय बांधले जाईल. जम्मूमध्ये डीआयजी-रँक अधिकाऱ्यांच्या अंतर्गत असलेल्या सेक्टरमध्ये राजौरी, सुंदरबनी, जम्मू आणि इंद्रेश्वर नगर यांचा समावेश आहे, तर मिझोरम आणि कछार सीमा सेक्टर सिलचर, ऐझॉल आणि मणिपूर येथून कार्यरत आहेत.

सीमा सुरक्षा दल (BSF) केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला अंतिम मंजुरीची वाट पाहत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून काही अंतिम मंजुरींसह उर्वरित मंजुरी आवश्यक आहेत. मंजुरीनंतर संपूर्ण प्रक्रियेसाठी पाच ते सहा वर्षे लागू शकतात. सीमा सुरक्षा दलात सध्या 193 बटालियन आहेत. प्रत्येक बटालियनमध्ये 1,000 हून अधिक जवान असतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुष्पा 2 च्या  ब्लॉकबस्टर यशानंतर सुपरस्टार झालास, आता नवी ओळख काय असेल? पाहा अल्लू अर्जुन काय म्हणाला? पुष्पा 2 च्या ब्लॉकबस्टर यशानंतर सुपरस्टार झालास, आता नवी ओळख काय असेल? पाहा अल्लू अर्जुन काय म्हणाला?
पुष्पा पार्ट 1 आणि पुष्पा पार्ट 2 या दोन्ही चित्रपटांनी अभिनेता अल्लू अर्जुनला एक वेगळी ओळख मिळून दिली. या चित्रपटांमुळे...
मैं झुकेगा नहीं साला…पुष्पाच्या या जगप्रसिद्ध डायलॉग मागे कोण? अल्लु अर्जुन याने सांगितले
Allu Arjun In Waves Summit 2025 : सिक्स पॅक करण्यासाठी हिरोईनकडून घेतली प्रेरणा, अल्लू अर्जुननं सांगितलं फिटनेसचं महत्त्व!
WAVES 2025: भारत डिजिटल क्रांतीचे…; श्रद्धा कपूरने घेतली इंस्टाग्राम प्रमुखांची भेट
Blue Tea : हृदयविकार असलेल्यांनी ब्लू टी प्यायल्यास काय होतं? जाणून घ्या
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची मुलगी शांताबाई साठे यांचे निधन
मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल