भाजप जेव्हा सत्तेपासून दूर होईल, तेव्हाच महागाई नियंत्रणात येणार – अखिलेश यादव

भाजप जेव्हा सत्तेपासून दूर होईल, तेव्हाच महागाई नियंत्रणात येणार – अखिलेश यादव

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष्य अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत भाजप सत्तेतून हटत नाही, तोपर्यंत देशात महागाईवर नियंत्रण येणार नाही. रोजगाराच्या संधी निर्माण होणार नाहीत आणि कायदा व सुव्यवस्थाही लागू होणार नाही.” माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

बिहारमधील एसआयआरवर बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, निवडणूक आयोगाला मतदार यादीतील त्रुटी सुधारण्याचे निर्देश सुप्रीम कोर्ट देईल, अशी त्यांना आशा आहे. त्यांनी पुढे म्हटले की, ज्या मतदारांची नावे यादीत समाविष्ट होणे बाकी आहे, ती सर्व नावे योग्यरित्या नोंदवली जातील. “आम्हाला विश्वास आहे की आम्हाला आशा आहे की सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी दुरुस्त करून घेईल,” असे त्यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;