डोंबिवलीकरांचे पाणी महागले! औद्योगिक क्षेत्रासाठी प्रति युनिट पावणेतीन, निवासीसाठी एक रुपयाची वाढ

डोंबिवलीकरांचे पाणी महागले! औद्योगिक क्षेत्रासाठी प्रति युनिट पावणेतीन, निवासीसाठी एक रुपयाची वाढ

एमआयडीसीने पाणी दरात दर युनिट मागे निवासीसाठी एक रुपया आणि औद्योगिक क्षेत्रासाठी पावणेतीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली असून त्याचा फटका डोंबिवलीतील ल घु, मध्यम व मोठ्या उद्योगांसह रहिवाशांनाही बसणार आहे. या निर्णयामुळे जनतेत व उद्योजकांमध्ये तीव्र असंतोष आहे. एमआयडीसीने ही दरवाढ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाणे जिल्ह्यातील उद्योजक संघटनांनी दिला आहे.

आधीच महागाई आणि उत्पादन खर्चामुळे त्रस्त असलेल्या लघु व मध्यम उद्योगांसाठी ही दरवाढ अतिरिक्त आर्थिक भार निर्माण करणारी आहे. सामान्य नागरिकांवरही त्याचा परिणाम होईल. ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणातून मुरबाड आणि बदलापूर भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र मोठ्या व्यासाच्या पाइपलाइनमधून १५ टक्के इतकी गळती होत आहे. याशिवाय पाण्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. अनेक संस्था व नागरिकांनी उपाययोजना सुचवल्या तरीही एमआयडीसी प्रशासनाला प्रभावी उपाययोजना करण्यात अपयश आले आहे. मूलभूत गरज असलेल्या पाण्यासारख्या सेवेसाठी दरवाढ करणे योग्य नसल्याची भावना डोंबिवलीकरांनी व्यक्त केली.

एमआयडीसीने केलेली दरवाढ अपेक्षित नव्हती. आधीच अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्याच्या टाक्या भरतच नाहीत. शुक्रवारी शटडाऊन घेतात पण त्यानंतर दोन दिवस पाणी येतच नाही. कारखान्यांना मुबलक पाणी मिळाले पाहिजे.
-वर्षा महाडिक, उद्योजक, डोंबिवली

पाणी चोरी, गळती आधी थांबवा !
पाणी गळती व चोरी थांबवणे, थकबाकी वसूल करणे आणि पारदर्शक प्रशासन यावर एमआयडीसीने भर दिला पाहिजे. नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांवर दरवाढ लादणे अन्यायकारक आहे, अशी नाराजी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी व्यक्त केली.

असा बसेल फटका
एमआयडीसीने काढलेल्या परिपत्रकानुसार निवासी क्षेत्रासाठी सध्याचा दर प्रति युनिट ८.२५ रुपये असून तो वाढून ९.२५ रुपये होणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी सध्याचा दर २२.५० रुपये असून तो वाढून २५.२५ रुपये प्रति युनिट होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका