रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली

रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली

लखनौ विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो विमान रनवेवर धावत असताना अचानक थांबवण्यात आले. पायलटने शेवटच्या क्षणी इर्मजन्सी ब्रेक लावले. विमानाच्या इंजिनला टेक ऑफसाठी दबाव मिळत नसल्याने पायलटने विमान थांबवण्याचा निर्णय घेतला, असे समजतंय.

इंडिगोच्या 6-ई-2111 विमानात 151 प्रवासी होते. यामध्ये समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या खासदार पत्नी डिंपल यादव यांचा समावेश होता. विमान अचानक थांबल्याने प्रवासी घाबरले. तथापि, नंतर प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने शनिवारी घडलेल्या या घटनेचा अहवाल मागितला आहे. दरम्यान, इंडिगोने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की तांत्रिक कारणांमुळे विमानाला टेकऑफ रद्द करावा लागला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काही तरतुदींना स्थगिती वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काही तरतुदींना स्थगिती
वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश दिला असून काही तरतुदींना स्थगिती देण्यात आली आहे. वक्फ (सुधारणा) कायद्यातील प्रमुख तरतुदी...
गुडघ्यांचा काळेपणा काढून टाकण्यासाठी हे आहेत हमखास खात्रीशीर उपाय, वाचा
आई म्हणजे आई असते…पुरापासून बछड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी बिबट्याने घेतला झाडाचा आश्रय
33 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य, हिंदूस्थानी वंशाच्या महिलेची तुरूंगात रवानगी, वाचा नेमकं काय घडलं?
UPI Rule Change – UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी नवा नियम, 15 सप्टेंबरपासून होणार अंमलबजावणी
सोने स्वस्त होणार? US Fed च्या बैठकीकडे जगाचे लक्ष, सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
कालची मॅच फिक्स होती आणि जुगारातले 25 हजार कोटी पाकिस्तानला गेले – संजय राऊत