स्मार्टफोनची बॅटरी फुगल्यावर काय करावे? वाचा या टिप्स

स्मार्टफोनची बॅटरी फुगल्यावर काय करावे? वाचा या टिप्स

सध्याच्या घडीला स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा गरजेचा भाग झालेला आहे. परंतु अनेकदा आपल्याला स्मार्टफोनची बॅटरी फुगलेली दिसते. ही अशी बॅटरी खूप धोकादायक ठरू शकते. बॅटरी फुगल्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याची भीती असते. म्हणून तुमच्या फोनची बॅटरी फुगली असेल तर ती बदलणे आवश्यक आहे. फोनची बॅटरी का फुगते आणि असे झाल्यास काय करावे ते जाणून घेऊया.

बॅटरी का फुगते?
आजकाल स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी असतात. बॅटरीच्या आत पातळ धातू आणि प्लास्टिकचे अनेक थर रासायनिक आवरणाने भरलेले असतात. या सर्व गोष्टी जेलसारख्या इलेक्ट्रोलाइटसह अॅल्युमिनियमच्या पाउचमध्ये ठेवल्या जातात. त्यानंतर, हे पाउच व्हॅक्यूम पॅक आणि हवाबंद करण्यासाठी उष्णतेने सील केले जाते. बऱ्याच वेळा हे जेल इलेक्ट्रोलाइट्स खराब होतात आणि गॅसमध्ये बदलतात. हा वायू दाब निर्माण करतो, ज्यामुळे पाउच फुगते. यामुळे बॅटरी फुगलेली दिसते.

बॅटरी फुगल्यावर काय करू नये?
बॅटरी फुगल्यानंतरही योग्यरित्या काम करू शकते, परंतु यासाठी चार्जिंगची काळजी खूप काळजीपूर्वक घ्यावी लागते. ही बॅटरी जास्त चार्ज झाली तर स्फोट होऊ शकतो. म्हणून तुमच्या फोनची बॅटरी फुगली असेल तर ती चार्ज करू नका. बॅटरी शक्य तितकी डिस्चार्ज होऊ द्या जेणेकरून आग लागण्याचा धोका राहणार नाही.

बरेच लोक घरीच फुगलेल्या बॅटरीची दुरुस्ती करण्यास सुरुवात करतात. असे करणे धोकादायक ठरू शकते. फोनच्या बॅटरीशी छेडछाड केल्याने, स्फोट होऊ शकतो. म्हणून घरी बॅटरी दुरुस्त करणे टाळा. बॅटरी काढण्यासाठी किंवा बदलण्यासाठी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानंगर जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा अधिकार शालेय व्यवस्थापन समित्यांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानंगर जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा अधिकार शालेय व्यवस्थापन समित्यांना
अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान...
अपहरण झालेल्या ट्रक चालकाचा हेल्पर सापडला पूजा खेडकर यांच्या घरात, आई मनोरमा खेडकरविरोधात गुन्हा दाखल
बायडेन सरकारमुळेच अमेरिकेत गुन्हेगारी वाढली; नागमल्लैया यांच्या हत्येनंतर ट्रम्प यांची प्रतिक्रिया
हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने समाजासमोर ठेवला अनोखा आदर्श, नवजात बालकांसाठी 30 लिटर ब्रेस्टमिल्क केले दान
‘ही’ डाळ व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता करेल दूर, वाचा सविस्तर
देवगड येथील राष्ट्रीय लोकअदालतीत 44 प्रकरणे निकाली; 14 लाख 15 हजार 840 रुपयांची वसुली
‘देवा’ जरा इकडे बघ! मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून अंबादास दानवे यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका