मराठवाड्यावर आभाळ फाटले; अनेक भागांत अतिवृष्टीने हाहाकार

मराठवाड्यावर आभाळ फाटले; अनेक भागांत अतिवृष्टीने हाहाकार

शनिवारी रात्री मराठवाड्यावर पुन्हा आभाळ फाटले. छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, धाराशीव आणि बीड जिह्यांत पावसाने थैमान घातले आहे. बीडमधील सर्वच नद्यांना महापूर आल्याने 32 गावांना पुराने वेढले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात 10 मंडळांत अतिवृष्टी झाल्याने महाप्रलय झाला.

रात्री तब्बल 200 मिमी पाऊस कोसळला आहे. त्यामुळे नाथसागरचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले असून सवा लाख क्युसेस प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या तालुक्यात सर्वत्र पूर आला असून त्यात लहानमोठी 60 जनावरे वाहून गेली. अनेक भागांत नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात शनिवारी रात्री पावसाने सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी महापूर आल्याने हाहाकार माजला. बीडमधील 32 गावांसह मराठवाड्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडला. पैठणमध्ये नाथसागरमध्ये मध्यरात्रीपासून पाण्याची आकक प्रचंड प्रमाणात काढल्यामुळे जायकवाडी धरणाचे 9 आपत्कालीन दरकाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनाने भल्या पहाटे घेतला. त्यामुळे प्रकल्पाचे सर्क 27 दरकाजे साडेचार फूट कर करण्यात आले आणि सवा लाख क्युसेकचा जलकिसर्ग करण्यात आला.

पैठण तालुक्यातील पाऊस

कचनेर (105.5 मिमी), पिंपळकाडी (115.3 मिमी), बालानगर (105.5मिमी), नांदर (208.8 मिमी), लोहगाव (158.0 मिमी), ढोरकीन (104.5 मिमी), बिडकीन (87.5 मिमी), पैठण (190.8 मिमी), पाचोड (107.5 मिमी) आणि किहामांडका (199.3 मिमी).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका