वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका

वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका

यंदा मॉन्सून नियोजित वेळेआधी 10 दिवस देशात दाखल झाला. त्याने येण्यासाठी जशी घाई केली, तशीच आता परतीसाठीही त्याची घाई सुरू झाली आहे. राजस्थानच्या काही भागातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील वातावरण पावसाच्या परतीसाठी पोषक आहे. त्यामुळे त्याचा परतीचा प्रवास वेगाने होण्याची शक्यता आहे. मात्र, या परतीच्या पावसाने महाराष्ट्राला चांगलाच दणका दिला आहे.

हिमाचाल प्रदेश, जम्मू कश्मीर, पंजाबमध्ये प्रकोप केल्यानंतर आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राजस्थानच्या काही भागातून मान्सून परतला आहे. यावर्षी वेळेपूर्वी आगमन झाल्यानंतर, मान्सूनचा परतीचा प्रवासही वेळेपूर्वी सुरू झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 14 सप्टेंबपासून पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मान्सून परतला आहे, तर त्याची परतीची नियोजित वेळ 17 सप्टेंबर आहे. त्याच वेळी, पुढील २-३ दिवसांत राजस्थानच्या काही भागांमधून आणि पंजाब आणि गुजरातच्या काही भागातून मान्सून परतीसाठी अनुकूल वातावरण आहे.

आतापर्यंत, देशात मान्सून हंगामात ८३६.२ मिमी पाऊस पडला आहे, तर सामान्य पाऊस ७७८.६ मिमी आहे, जो ७ टक्के जास्त आहे. मे महिन्यात, आयएमडीने असा अंदाज वर्तवला होता की जून-सप्टेंबर मान्सून हंगामात भारतात ८७ सेमी या दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ५० वर्षांच्या सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस ‘सामान्य’ मानला जातो.

या परतीच्या पावसाने महाराष्ट्रात रविवारापासून तुफान बॅटिंगला सुरुवात केली आहे. मुंई, ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टीसह पुणे, मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पाऊस होत आहे. मुसळधार पावसाने मुंबईच्या गतीला ब्रेक लागला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने चाकरमान्यांना चांगलाच फटका बसला आहे. पावसाने रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेगही मंदावला आहे.

हवामान खात्याने मुंबईला पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. मुंबईत मुसळधार पावसाने प्रशासनही अलर्ट झाले असून सखल भागात पाणी साचणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पावसामुळे हार्बर आणि मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरू असून पश्चिम रेल्वेचा वेगही मंदावला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काही तरतुदींना स्थगिती वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काही तरतुदींना स्थगिती
वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश दिला असून काही तरतुदींना स्थगिती देण्यात आली आहे. वक्फ (सुधारणा) कायद्यातील प्रमुख तरतुदी...
गुडघ्यांचा काळेपणा काढून टाकण्यासाठी हे आहेत हमखास खात्रीशीर उपाय, वाचा
आई म्हणजे आई असते…पुरापासून बछड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी बिबट्याने घेतला झाडाचा आश्रय
33 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य, हिंदूस्थानी वंशाच्या महिलेची तुरूंगात रवानगी, वाचा नेमकं काय घडलं?
UPI Rule Change – UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी नवा नियम, 15 सप्टेंबरपासून होणार अंमलबजावणी
सोने स्वस्त होणार? US Fed च्या बैठकीकडे जगाचे लक्ष, सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
कालची मॅच फिक्स होती आणि जुगारातले 25 हजार कोटी पाकिस्तानला गेले – संजय राऊत