IND VS PAK – टीम इंडियासमोर पाकड्यांचे लोटांगण, सात गडी राखून केला दणदणीत पराभव

IND VS PAK – टीम इंडियासमोर पाकड्यांचे लोटांगण, सात गडी राखून केला दणदणीत पराभव

आशिया कपमध्ये टीम इंडिया व पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या दमदार गोलंदाजी व जबरदस्त फलंदाजीपुढे पाकड्यांनी सपशेल लोटांगण घातलं व टीम इंडियाने हा सामना आठ गडी राखून जिंकला. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानसमोर विजयाची मालिका हिंदुस्थानने कायम ठेवली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडलेल्या पाकड्यांचा टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे निभावच नाही लागला. फक्त शाहिबझादा फरहान (44 चेंडून 40 धावा) आणि शाहिन आफ्रिदी (16 चेंडून 33 धावा) या दोघांमुळे पाकिस्तानच्या संघांने शंभरी पार केली. पाकिस्तानच्या सहा खेळाडूंना दोन अंकी आकडा देखील गाठता नाही आला. कुलदीप यादवने 3, जसप्रीत बुमराहने व अक्षर पटेल प्रत्येकी 2 आणि हार्दीक पांड्या व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत पाकिस्तानच्या नऊ खेळाडूंना तंबून पाठवले. 20 षटकांअखेर पाकिस्तानने 127 धावा केल्या.

128 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. मात्र दुसऱ्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूंवर शुभमन गिल बाद झाला व टीम इंडियाला पहिला धक्का बसला. त्यानंतर जोरदार फटकेबाजी करणारा अभिषेक शर्मा तिसऱ्या षटकात 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार सुर्यकुमार यादव व तिलक वर्माने डाव सावरला व तिसऱ्या विकेटसाठी 56 धावांची खेळी केली. टीम इंडि

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका