IND vs PAK – सामन्याला सुरुवात, मात्र अर्ध स्टेडियम रिकामं; देशभक्तांनी फिरवली पाठ

IND vs PAK – सामन्याला सुरुवात, मात्र अर्ध स्टेडियम रिकामं; देशभक्तांनी फिरवली पाठ

टीम इंडिया व पाकिस्तानमधला आशिया कपमधील सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याला संपूर्ण देशभरातून विरोध होत असताना बीसीसीआय व केंद्र सरकार मात्र हा सामना खेळवण्यावर अडून बसले होते. मात्र याचा परिणाम स्टेडियममध्ये दिसला. या सामन्यादरम्यान दुबईचे स्टेडियम अर्ध्याहून अधिक रिकामं असल्याचे समोर आले आहे.

हिंदुस्थान पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामना जाहीर होताच त्याची तिकीटं अवघ्या काही मिनिटांत हातोहात विकली जातात. मात्र आजच्या सामन्याची हजारो तिकीटे सामना सुरू होण्यापूर्वी पर्यंत शिल्लक होती. त्याचा परिणाम स्टेडियममध्येही दिसला. स्टेडियम अर्धे रिकामे असल्याचे दिसून आले.

मागच्या वेळी विक्रीचा धडाका

यूएई अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीत याच सामन्याची तिकिटे फक्त चार मिनिटांत संपली होती. त्या दिवशी दोन वेळा तिकिट खिडकी उघडावी लागली होती. पण यावेळी ती क्रेझ गायब झालीय. सोशल मीडियावर चाहत्यांनीही निराशा व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका