शिवसेनेच्या रणरागिणींचा एल्गार, हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर राष्ट्रभक्त जनतेचा बहिष्कार; महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट, टीव्ही फोडले, बॅट तोडल्या, पंतप्रधान मोदींना पाठवली कुंकवाची हजारो पार्सल

शिवसेनेच्या रणरागिणींचा एल्गार, हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर राष्ट्रभक्त जनतेचा बहिष्कार; महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट, टीव्ही फोडले, बॅट तोडल्या, पंतप्रधान मोदींना पाठवली कुंकवाची हजारो पार्सल

हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेनेने पुकारलेल्या ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलनाचा वणवा आज देशभरात पसरला. मोदी सरकारच्या विरोधात देशात संतापाची तीव्र लाट उसळली. मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेनेच्या रणरागिणींनी रस्त्यावर उतरत एल्गार पुकारला. महाराष्ट्राच्या घराघरातून जमा केलेले कुंकू, ओटय़ा आणि बांगडय़ांची हजारो पार्सल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली. त्याच वेळी शिवसैनिकांनी टीव्ही फोडले आणि बॅट तोडून संताप व्यक्त केला. राष्ट्रभक्त जनतेने या सामन्यावर बहिष्कार टाकला. दरम्यान, त्यामुळे दुबईतील क्रिकेट स्टेडियमही सामन्या वेळी अर्धे रिकामेच होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला आधीच विरोध दर्शवला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन याविषयी भूमिका मांडली. त्यांच्या ठाम भूमिकेचे प्रतिध्वनी आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभरात उमटले. आम आदमी पक्ष व एमआयएमनेही हीच भूमिका मांडत रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. तिरुवअनंतपुरममध्ये शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. दिल्लीत मंगतराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आंदोलन केले.

अहमदाबाद, वडोदरा, दिल्ली, बंगळुरूतही आंदोलन

देशातील अनेक राज्यांत लोक रस्त्यावर उतरले. आम आदमी पक्षाने दिल्ली व चंदिगडमध्ये जोरदार आंदोलन केले. अहमदाबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने निदर्शने केली. कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी मोदी सरकारचा धिक्कार केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका