देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे

देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे

देशात विदेशी नस्लांच्या कुत्र्यांसह इतर विदेशी पाळीव प्राण्यांच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या वाढत्या मागणीमुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्राण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ज्यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका देखील वाढला आहे. गेल्या पाच वर्षांत जिवंत प्राण्यांच्या तस्करीच्या घटनांमध्ये गेल्या 5 वर्षांत 4 पट वाढ झाली आहे, असे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे.

या वृत्तानुसार, मुंबई विमानतळावर यावर्षी जानेवारी ते जुलै २०२५ या कालावधीत ३७७ विदेशी प्राण्यांची तस्करी पकडण्यात आली आहे. ज्यामध्ये साप, कासव, सरडे, माकडे आणि दुर्मीळ पक्षी यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश प्राणी थायलंडमधून बेकायदेशीरपणे आणले गेले. उदाहरणार्थ, ३१ मे २०२५ रोजी थाय एअरवेजच्या फ्लाइट टीजी ३१७ ने बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून ५२ विदेशी सरपटणारे प्राणी जप्त करण्यात आले, ज्यात तीन स्पायडर-टेल्ड हॉर्न्ड व्हायपर्स, पाच एशियन लीफ टर्टल्स आणि ४४ इंडोनेशियन पिट व्हायपर्स यांचा समावेश होता. यापैकी एक साप मृतावस्थेत आढळला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे नुकत्याच उघड झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तिन संशयितांच्या न्यायालयाने पोलीस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे....
रोज सकाळी प्या शेवग्याच्या पानांचे पाणी, एक दोन नव्हे तर तुमच्या शरीराला मिळतील ‘हे’ 7 आश्चर्यकारक फायदे
माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन
Mumbai News – गोराई समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात टळला! पर्यटकांनी भरलेली मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली
देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे
मेहुल चोक्सीला तुरुंगात युरोपीय मानवाधिकार मानकांनुसार मिळणार सुविधा, हिंदुस्थानने बेल्जियमला दिली माहिती
नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा