सलमान खान घाणेरडा आणि गुंड प्रवृत्तीचा माणूस; दबंग’च्या दिग्दर्शकाने केले भाईजानच्या फॅमिलीवर आरोप

सलमान खान घाणेरडा आणि गुंड प्रवृत्तीचा माणूस; दबंग’च्या दिग्दर्शकाने केले भाईजानच्या फॅमिलीवर आरोप

बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आणि कॉन्ट्रॉवर्सी एक समीकरण बनले आहे. त्यामुळे तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहिलाय. सलमान खानने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले. चित्रपटातील त्याच्या गाण्यांचे आजही चाहत्यांमध्ये तितकीच क्रेझ आहे. ‘दबंग’या चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने चित्रपट निर्माते अभिनव कश्यप याने पुन्हा एकदा सलमानवर निशाणा साधला. सलमान खान एक गुंड प्रवृत्तीचा आणि एक वाईट व्यक्ती असल्याचा आरोप केला आहे.

सलमान खानचा दबंग हा चित्रपट 2010ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील त्याचा पोलिसांच्या भूमिकेचा लूक चाहत्यांना फार आवडला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सलमानवर आणि त्याच्या कुटुंबावर अनेक आरोप केले. ‘सलमान कधीही यात सहभागी होत नाही. त्याला अभिनयातही रस नाही आणि गेल्या 25 वर्षांपासून तो काम करत नाही. तो कामावर येऊन आपल्यावर जणू उपकारच करतो. त्याला सेलिब्रिटी बनण्यातच जास्त रस आहे. पण त्याला अभिनयात रस नाही. तो एक गुंड आहे. दबंगपूर्वी मला याबद्दल माहिती नव्हती. सलमान वाईट वृत्तीचा आहे. तो एक घाणेरडा माणूस आहे., असा आरोप यावेळी अभिनव यांनी केला.

जर तुम्ही त्याच्याशी सहमत नसाल तर…

अभिनव याने सलमानसोबतच त्याच्या कुटुंबावरही टीका केली. सलमान खान हा बॉलिवूडमधील स्टार सिस्टीमचा भाग आहे. तो 50 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये असलेल्या एका कुटुंबातून आला आहे. सलमान फक्त तेच पुढे घेऊन जात आहे. पण ते त्रास देणारे लोक आहेत. जर तुम्ही त्याच्याशी सहमत नसाल तर, तो तुमच्या मागेच लागतो, असेही अभिनव कश्यप यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;