Ratnagiri News – मिरकरवाडा येथील समुद्रात बेपत्ता झालेल्या दोन खलांशांपैकी एकाचा मृतदेह सापडला

Ratnagiri News – मिरकरवाडा येथील समुद्रात बेपत्ता झालेल्या दोन खलांशांपैकी एकाचा मृतदेह सापडला

मासेमारी करून परत मिरकरवाडा बंदरात येणारी ‘अमीन आएशा’ ही मच्छिमार नौका बुडाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या नौकेवर एकूण आठ खलाशी होते. त्यापैकी सहा जण सुखरूप बचावले असून दोन जण बेपत्ता होते. बेपत्ता दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. दुसरा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.

अमीन आएशा ही नौका मासेमारी करून परतत असताना लाटेचा तडाखा बसल्याने समुद्रात बुडाली. दुर्घटनेनंतर बोटीवरील सहा खलाशांनी पोहत किनारा गाठण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुसरी स्थानिक मच्छिमार नौका मदतीला धावून आल्याने सहाही जण सुखरूप बचावले आहेत. तर दोन जण बेपत्ता होते. त्यापैकी एकाचा मृतदेह दुपारी 3 वाजता मिऱ्या समुद्रकिनारी सापडला. स्थानिक मच्छिमारांनी मृतदेह बाहेर काढला. विनोद धुरी असे मयत खलाशाचे नाव आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या व 125 वर्षाची निजामकालीन परंपरा असलेल्या प्रसिद्ध अशा टेंबे गणपतीचे सोमवारी प्रतिपदे दिवशी हजारो भाविकांच्या...
Mumbai News – गोराई समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात टळला! पर्यटकांनी भरलेली मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली
देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे
मेहुल चोक्सीला तुरुंगात युरोपीय मानवाधिकार मानकांनुसार मिळणार सुविधा, हिंदुस्थानने बेल्जियमला दिली माहिती
नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा
Mumbai News – बहिणीच्या प्रियकराची हत्या केली, मग पोलिसांसमोर कबुली, मालाडमध्ये नेमकं काय घडलं?
नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तीव्र निदर्शने; हिंसक घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी