रायगडातील 25 धरणे ओव्हरफ्लो, 67.989 दशलक्ष घन मीटर पाणीसाठा; पाणीटंचाईचे टेन्शन संपले

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 646 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसामुळे रायगड जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या 28 धरणांपैकी 25 धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. सर्व धरणामध्ये 67.989 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा या धरणांमध्ये जमा झाला आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे पुढील वर्षीच्या मे महिन्यापर्यंत रायगडवासीयांचे पाण्याचे टेन्शन संपले आहे.

डॅम तुडुंब
सुतारवाडी, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, वरंघ, कोडगाव, उन्हेरे, कवेळे, भिलवले, वावा, फणसाड, घोटवडे, कोलते-मोकाशी, डोणवत, आंबेघर, मोरबे, अवसरे, बामणोली, ढोकशेत ही धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत तर कार्ले धरणात 98, रानिवली 92, पुनाडे 58 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

कोलाड येथील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या 28 प्रकल्पात मे महिन्यात 23 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यातील 9 घरणांमध्ये दहा टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईचे ढग दाटले होते. मे महिन्याच्या शेवटी तुरळक पाऊस पडला. यांनतर जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला. जुलै महिन्यात सरासरीच्या मानाने कमी पाऊस पडला. यांनतर ऑगस्ट महिन्यात पावसाची संततधार सुरू होती. सध्याही पावसाची संततधार सुरू आहे. आतापर्यंत धरणांच्या क्षेत्रातही चांगल्या पावसाची नोंद झाली.

कोलाडच्या लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या 28 धरणांपैकी 25 धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. उर्वरित तीन धरणांपैकी २ धरणांमध्ये सरासरी संचय क्षमतेच्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. तर उर्वरित एका घरणात संचय क्षमतेच्या 58 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणामध्ये 69.989 दशलक्ष घन मीटर पाणीसाठा या धरणांमध्ये जमा झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका होणार ? नवी कॅन्सर लस किती प्रभावी ठरणार ? Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका होणार ? नवी कॅन्सर लस किती प्रभावी ठरणार ?
जगभरात वेगाने पसरणाऱ्या कॅन्सर आजारा संदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाच्या संशोधकांनी आता कॅन्सरची व्हॅक्सीन ( Cancer Vaccine...
तिसऱ्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण, खून करून उचलले धक्कादायक पाऊल
आधारकार्ड ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारावाच लागेल! SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे ECI ला महत्त्वाचे आदेश
थुलथुलीत झालेले पोट कमी करण्यासाठी या भाज्या खायलाच हव्यात, वाचा
बलात्काराच्या आरोपीला 25 लाख रुपये नुकसान भरपाई, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कायद्याने घेतला महिलांचा बळी; अफगाणिस्तानातील भूकंपात पुरुषच का बचावले? जाणून घ्या कारण…
तुम्ही थेट गॅसवर चपाती भाजताय का?