Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे नुकत्याच उघड झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तिन संशयितांच्या न्यायालयाने पोलीस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे. तर या हत्याकांड एका संशयितांची न्यायालयीन पोलीस कोठडी रवानगी करण्यात आली.

दुर्वास दर्शन पाटील (वय २५, रा. जंगमवाडी, वाटद-खंडाळा, रत्नागिरी), विश्वास पवार (वय ४१, रा. कळझोंडी-बौद्धवाडी, रत्नागिरी) व सुशांत शांताराम नरळकर (वय ४०, रा. आदर्शनगर, वाटद-खंडाळा, रत्नागिरी) अशी कोठडीत वाढ झालेल्या संशयितांची नावे आहे. ही घटना शनिवारी (ता. ३०) दुपारी बाराच्या सुमारास आंबाघाट येथे उघडकीस आली होती.

मिरजोळे येथील भक्ती मयेकर या या तरुणीच्या खुनाचा उलगडा झाला होता. भक्ती मयेकर हिच्या खुनाचा उलगडा होताच एका पाठोपाठ एक तीन खून झाल्याचे निष्पन्न होताच संपूर्ण जिल्हा हादरला. भक्ती मयेकर हिचा खून करून दुर्वास पाटील याने तिचा मृतदेह आंबा घाट येथे फेकला होता. या खुनाचा उलगडा झाल्यानंतर दुर्वास पाटील याना भक्ती मयेकर हिच्यासह अन्य दोघांचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले. तिघांपैकी एकाचा मृतदेह अद्यापही आढळून आलेला नाही. आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने दुर्वास पाटील याने तीनही मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचे समोर आले.

अटक करण्यात आलेल्या चारपैकी दुर्वास पाटील, सुशांत नरळकर, विश्वास पवार यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आणखीन चार दिवसांची म्हणजेच ११ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्याकांड मधील चौथा संशयित निलेश भिंगार्डे याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये तरुणांचा उद्रेक! संसद पेटवली, काठमांडू लष्कराच्या हाती!! पोलिसांच्या बेछूट गोळीबारात 20 ठार, 400 जखमी… हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये तरुणांचा उद्रेक! संसद पेटवली, काठमांडू लष्कराच्या हाती!! पोलिसांच्या बेछूट गोळीबारात 20 ठार, 400 जखमी…
सरकारचा हुकूमशाही कारभार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात नेपाळमध्ये आज मोठा उद्रेक झाला. सरकारच्या मनमानीला वैतागलेल्या तरुणाईला सोशल मीडियावरील बंदीचे निमित्त मिळाले...
उपराष्ट्रपती पदाची आज निवडणूक, व्हीप नसल्यामुळे खासदार ‘राजा’, एनडीएला क्रॉस वोटिंगचा धोका
आधार कार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरणार, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश
देशात प्रथमच डिजिटल जनगणना, दोन वर्षांची मुदत; 34 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती
अजित पवारच जलसंपदा घोटाळय़ाचे सूत्रधार, तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा गंभीर आरोप
आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी एकवटणार
हिंदुस्थानी आयटी क्षेत्रात लाखो नोकऱ्या जाणार, अमेरिकेबाहेर काम देणाऱ्या कंपन्यांवर 25 टक्के टॅरिफचा बडगा