चिकन खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा, तीन वर्षाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

चिकन खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा, तीन वर्षाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

चिकन, उकडलेली अंडी, वडापाव खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. पाचही जणांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. भाईंदरमधील बजरंग नगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मीरा-भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौर्या कुटुंबाने रविवारी रात्री जेवणात चिकन, भात, उकलडलेली अंडी आणि वडापाव खाल्लं. जेवणानंतर काही वेळातच पती-पत्नी, मेहुणा आणि तीन मुलींना, पोटदुखी उलट्या आणि जुलाब होऊ लागले. सर्वांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. विषबाधेमुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनानंतर प्राथमिक अहवालात म्हटलं आहे.

रमेश मौर्या, नीलम मौर्या आणि राजकुमार मौर्या यांच्या भाईंदरमधील डॉ. भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 6 वर्ष आणि 8 वर्षाच्या दोन मुलींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कुटुंबीयांना नेमकं कोणत्या पदार्थातून विषबाधा झाली याबाबत फॉरेन्सिक पथक तपास करत आहे. वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल, असं कांबळे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या व 125 वर्षाची निजामकालीन परंपरा असलेल्या प्रसिद्ध अशा टेंबे गणपतीचे सोमवारी प्रतिपदे दिवशी हजारो भाविकांच्या...
Mumbai News – गोराई समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात टळला! पर्यटकांनी भरलेली मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली
देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे
मेहुल चोक्सीला तुरुंगात युरोपीय मानवाधिकार मानकांनुसार मिळणार सुविधा, हिंदुस्थानने बेल्जियमला दिली माहिती
नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा
Mumbai News – बहिणीच्या प्रियकराची हत्या केली, मग पोलिसांसमोर कबुली, मालाडमध्ये नेमकं काय घडलं?
नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तीव्र निदर्शने; हिंसक घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी