अनंत चतुर्दशीनंतर रायगडमध्ये बाप्पाच्या आगमनाचे वेध; बुधवारी विराजमान होणार साखरचौथ बाप्पा

अनंत चतुर्दशीनंतर रायगडमध्ये बाप्पाच्या आगमनाचे वेध; बुधवारी विराजमान होणार साखरचौथ बाप्पा

भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला राज्यात सार्वजनिक मंडळांसह घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होते. तर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या…अशा जयघोष करत बाप्पाला निरोप देण्यात येतो. राज्यभरात बाप्पाला निरोप दिल्यानंतर रायगडमध्ये बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येते. या प्रथा सध्या वाढत असून याला लोकप्रियताही मिळत आहे.

रायगड आणि पेणमधील अनेक गावे ही बाप्पाची गावे म्हणून ओळखली जातात. या गावांमध्ये गणपती बाप्पाच्या सुबक मूर्ती साकारल्या जातात. हे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे जसजसा गणेशोत्स जवळ येतो. तसे हे कारागीर कामात गुंतून जातात. भाविकांना योग्य वेळी गणेशमूर्ती देण्यासाठी ते रात्रीचा दिवस करतात. या सर्व कामाच्या गडबडीत त्यांना घरचा गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यामुळे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळातील बाप्पाचे अनंत चतुर्दशीला विसर्जन झाल्यानंतर येणाऱ्या पुढच्या चतुर्थीला साखर चतुर्थी म्हणतात. या चतुर्थीला हे कारागीर गणेशमूर्तीची स्थापना करून पूजा करतात. त्यामुळे याला साखरचौथ गणेशोत्सव म्हणतात. त्यामुळे गणपती कारागीरांपासून ही प्रथा सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

साखरचौथ गणपती रायगड जिल्ह्यांत साजरा होणारा गणेशोत्सव आहे, जो अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (साखर चतुर्थीला) साजरा केला जातो. या गणपतींना ‘गौरा गणपती’ असेही म्हणतात आणि ते साधारणपणे अडीच ते पाच दिवसांसाठी असतात. तसेच २१ दिवसांचे काही गणपतीही या उत्सवात असतात.

राज्यात आणि विशेष करून कोकणात गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. तसेच गेल्या काही वर्षात साखरचौथ गणपतीची प्रथा लोकप्रिय होत आहे. तसेच ज्यांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यांच्यासाठी साखरचौथ गणपती ही गणशपूजनासाठी पर्वणी ठरत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;