अनंत चतुर्दशीनंतर रायगडमध्ये बाप्पाच्या आगमनाचे वेध; बुधवारी विराजमान होणार साखरचौथ बाप्पा

अनंत चतुर्दशीनंतर रायगडमध्ये बाप्पाच्या आगमनाचे वेध; बुधवारी विराजमान होणार साखरचौथ बाप्पा

भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला राज्यात सार्वजनिक मंडळांसह घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होते. तर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या…अशा जयघोष करत बाप्पाला निरोप देण्यात येतो. राज्यभरात बाप्पाला निरोप दिल्यानंतर रायगडमध्ये बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येते. या प्रथा सध्या वाढत असून याला लोकप्रियताही मिळत आहे.

रायगड आणि पेणमधील अनेक गावे ही बाप्पाची गावे म्हणून ओळखली जातात. या गावांमध्ये गणपती बाप्पाच्या सुबक मूर्ती साकारल्या जातात. हे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे जसजसा गणेशोत्स जवळ येतो. तसे हे कारागीर कामात गुंतून जातात. भाविकांना योग्य वेळी गणेशमूर्ती देण्यासाठी ते रात्रीचा दिवस करतात. या सर्व कामाच्या गडबडीत त्यांना घरचा गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यामुळे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळातील बाप्पाचे अनंत चतुर्दशीला विसर्जन झाल्यानंतर येणाऱ्या पुढच्या चतुर्थीला साखर चतुर्थी म्हणतात. या चतुर्थीला हे कारागीर गणेशमूर्तीची स्थापना करून पूजा करतात. त्यामुळे याला साखरचौथ गणेशोत्सव म्हणतात. त्यामुळे गणपती कारागीरांपासून ही प्रथा सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

साखरचौथ गणपती रायगड जिल्ह्यांत साजरा होणारा गणेशोत्सव आहे, जो अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (साखर चतुर्थीला) साजरा केला जातो. या गणपतींना ‘गौरा गणपती’ असेही म्हणतात आणि ते साधारणपणे अडीच ते पाच दिवसांसाठी असतात. तसेच २१ दिवसांचे काही गणपतीही या उत्सवात असतात.

राज्यात आणि विशेष करून कोकणात गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. तसेच गेल्या काही वर्षात साखरचौथ गणपतीची प्रथा लोकप्रिय होत आहे. तसेच ज्यांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यांच्यासाठी साखरचौथ गणपती ही गणशपूजनासाठी पर्वणी ठरत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – मिरकरवाडा येथील समुद्रात बेपत्ता झालेल्या दोन खलांशांपैकी एकाचा मृतदेह सापडला Ratnagiri News – मिरकरवाडा येथील समुद्रात बेपत्ता झालेल्या दोन खलांशांपैकी एकाचा मृतदेह सापडला
मासेमारी करून परत मिरकरवाडा बंदरात येणारी ‘अमीन आएशा’ ही मच्छिमार नौका बुडाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या नौकेवर एकूण आठ...
अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत 200 कोटींचा घोटाळा, आमदार रोहित पवार यांचा आरोप
Ratnagiri News – तिहेरी हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा, शिवसेनेची मागणी
इस्रायलमध्ये बस स्टॉपवर अंधाधुंद गोळीबार, 5 जण ठार; 15 जण जखमी
Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका होणार ? नवी कॅन्सर लस किती प्रभावी ठरणार ?
तिसऱ्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण, खून करून उचलले धक्कादायक पाऊल
आधारकार्ड ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारावाच लागेल! SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे ECI ला महत्त्वाचे आदेश