नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा

नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा

नेपाळमधील भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधातील तीव्र निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीत २० जणांचा मृत्यू झाला असून ३४७ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री रमेश लेखक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नेपाळ सरकारने ४ सप्टेंबर रोजी फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. सरकारने या प्लॅटफॉर्म्सनी देशात नोंदणी न केल्याने आणि करचुकवेगिरी, सायबर सुरक्षा आणि कंटेंट मॉडरेशनच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. मात्र या बंदीमुळे तरुणांमध्ये तीव्र संताप पसरला, कारण त्यांना हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न वाटला. परिणामी, हजारो तरुणांनी काठमांडूमधील संसद भवन परिसरात निदर्शने केली.

निदर्शने सुरू झाल्यानंतर निदर्शनकर्त्यांनी संसद भवनाच्या परिसरात प्रवेश केला. यावेळी काहींनी भिंतींवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधूर, वॉटर कॅनन, लाठीमार आणि रबर बुलेट्सचा वापर केला. यात २० जणांचा मृत्यू झाला, तर ३४७ हून अधिक जण जखमी झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे नुकत्याच उघड झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तिन संशयितांच्या न्यायालयाने पोलीस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे....
रोज सकाळी प्या शेवग्याच्या पानांचे पाणी, एक दोन नव्हे तर तुमच्या शरीराला मिळतील ‘हे’ 7 आश्चर्यकारक फायदे
माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन
Mumbai News – गोराई समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात टळला! पर्यटकांनी भरलेली मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली
देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे
मेहुल चोक्सीला तुरुंगात युरोपीय मानवाधिकार मानकांनुसार मिळणार सुविधा, हिंदुस्थानने बेल्जियमला दिली माहिती
नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा