Bihar SIR – ‘वोटबंदी’ षडयंत्राला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, आधार कार्ड स्वीकारावेच लागेल; योगेंद्र यादव यांच्या प्रयत्नांना यश

Bihar SIR – ‘वोटबंदी’ षडयंत्राला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, आधार कार्ड स्वीकारावेच लागेल; योगेंद्र यादव यांच्या प्रयत्नांना यश

सर्वोच्च न्यायालयाने आज बिहारमधील मतदार यादी पुर्नर्निरीक्षण (SIR) प्रकरणी सुनावणी करत निवडणूक आयोगाला मतदार यादीसाठी आधार कार्ड १२ वा वैध दस्तऐवज म्हणून स्वीकारण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव म्हणाले आहेत की, “गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईनंतर मतदार यादीतून लाखो-करोडो लोकांना वगळण्याच्या वोटबंदीच्या षडयंत्राला मोठा ब्रेक लागला आहे.”

योगेंद्र यादव म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी ११ दस्तऐवजांची यादी जाहीर केली होती. यामध्ये पासपोर्ट, राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यांसारखे दस्तऐवज समाविष्ट होते, जे सर्वसामान्यांच्या, विशेषतः बिहारसारख्या राज्यांतील नागरिकांच्या आवाक्याबाहेर होते. दुसरीकडे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड यांसारखे दस्तऐवज, जे निवडणूक आयोग नेहमी स्वीकारत आला आहे, त्यांना आता नाकारण्याची भूमिका घेतली जात होती. याउलट जे दस्तऐवज उपलब्ध नाहीत, त्यांचीच मागणी केली जात होती, असा आरोप यादव यांनी केला.

यादव पुढे म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दोनदा निवडणूक आयोगाला आधार कार्ड स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. मात्र आयोगाने याकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे, तर ज्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी (BLO) आधार कार्ड स्वीकारले, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. आज सर्वोच्च न्यायालयाने या सर्व बाबींची दखल घेत स्पष्ट आदेश दिला की, आधार कार्ड आता मतदार यादीसाठी १२ वा वैध दस्तऐवज म्हणून स्वीकारावे लागेल.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या व 125 वर्षाची निजामकालीन परंपरा असलेल्या प्रसिद्ध अशा टेंबे गणपतीचे सोमवारी प्रतिपदे दिवशी हजारो भाविकांच्या...
Mumbai News – गोराई समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात टळला! पर्यटकांनी भरलेली मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली
देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे
मेहुल चोक्सीला तुरुंगात युरोपीय मानवाधिकार मानकांनुसार मिळणार सुविधा, हिंदुस्थानने बेल्जियमला दिली माहिती
नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा
Mumbai News – बहिणीच्या प्रियकराची हत्या केली, मग पोलिसांसमोर कबुली, मालाडमध्ये नेमकं काय घडलं?
नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तीव्र निदर्शने; हिंसक घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी