Mumbai News – गोराई समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात टळला! पर्यटकांनी भरलेली मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली

Mumbai News – गोराई समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात टळला! पर्यटकांनी भरलेली मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली

गोराई समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात टळला आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या पर्यटकांची भरतीच्या पाण्यात अडकल्याची घटना सोमवारी घडली. कोस्ट गार्ड आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी गोराई पोलीस ठाण्यात चालक आणि बस मालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही पर्यटक मिनी बसने गोराई समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. चालकाने बस किनाऱ्याजवळ उभी केली होती. रविवारी रात्रीपासूनच समुद्रात हाय-टाईड असल्याने समुद्रात लाटा उसळल्या होत्या. भरतीमुळे काही क्षणातच पाणी किनाऱ्यावर आले आणि मिनी बस लाटांमध्ये अडकली. बस सर्व बाजूंनी पाण्याने वेढली गेली होती, ज्यामुळे ती बाहेर पडू शकली नाही.

सुदैवाने, स्थानिक रहिवासी आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोराई पोलिसांनी चालकाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे नुकत्याच उघड झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तिन संशयितांच्या न्यायालयाने पोलीस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे....
रोज सकाळी प्या शेवग्याच्या पानांचे पाणी, एक दोन नव्हे तर तुमच्या शरीराला मिळतील ‘हे’ 7 आश्चर्यकारक फायदे
माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन
Mumbai News – गोराई समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात टळला! पर्यटकांनी भरलेली मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली
देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे
मेहुल चोक्सीला तुरुंगात युरोपीय मानवाधिकार मानकांनुसार मिळणार सुविधा, हिंदुस्थानने बेल्जियमला दिली माहिती
नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा