आनंदाचा क्षण काही क्षणातच दुःखात बदलला! चेंगराचेंगरीवर अखेर तीन महिन्यांनी विराटने सोडले मौन

आनंदाचा क्षण काही क्षणातच दुःखात बदलला! चेंगराचेंगरीवर अखेर तीन महिन्यांनी विराटने सोडले मौन

आयपीएल 2025चे विजेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) आनंद चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे काही क्षणातच मावळला होता. पहिल्यांदाच ट्रॉफी उंचावल्याने बंगळुरूतील चिन्नस्वामी स्टेडियम आणि परिसरात आरसीबीच्या चाहत्यांची अलोट गर्दी उसळली होती. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले. या घटनेवर आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने अखेर मौन सोडले असून आनंदाचा क्षण काही क्षणातच दुःखात बदलला असल्याची भावनिक प्रतिक्रिया त्याने दिली.

विराटची भावनिक प्रतिक्रिया आरसीबीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहताना विराटने आगामी काळात फ्रेंचायझी अधिक सावधगिरीने आणि जबाबदारीने पाऊल टाकेल, असे आश्वासन दिले. किंग कोहलीचे हे विधान ‘आरसीबी केअर्स’ उपक्रमाचा भाग आहे, ज्याअंतर्गत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यात उपाययोजना केल्या जाणार आहेत.

4 जून रोजी हृदयद्रावक घटना घडली, त्यासाठी जीवनात तुम्हाला कधीच तयार केले जात नाही. आमच्या फ्रेंचायझीच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा क्षण असायला हवा होता, पण तो एका दुःखद क्षणात बदलला. ज्या कुटुंबांनी त्यांचे प्रियजन गमावले त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. तुमचे झालेले नुकसान आमच्या कथेचा भाग आहे. त्यामुळे आता आपण सर्व जण सावधानता, आदर आणि जबाबदारीने पुढे जाऊया.

विराट कोहली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बोरामणीजवळ एसटीचा अपघात; 16 जखमी बोरामणीजवळ एसटीचा अपघात; 16 जखमी
    ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसने कंटेनरला ठोकरले असून, यात 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बिदर-पंढरपूर या बसला अपघात झाला
निर्माल्यात गेलेली 2 लाखांची चेन बाप्पाच्या कृपेने परत मिळाली, सफाई कामगार ठरले विघ्नहर्ता
नवी मुंबईत उरलेले अन्नधान्य, खाद्यपदार्थ नारायण गडावर जाणार; मराठा आंदोलकांसाठी आली विक्रमी शिदोरी
डोंबिवलीत भूमाफियांनी तलाठी कार्यालय फोडले; कागदपत्रे पळवण्याचा प्रयत्न, नवे टाळे लावून पोबारा
सरकारने पुन्हा फसवले; हनुमान कोळीवाडावासीयांना क्लस्टरमध्ये कोंबणार, पुनर्वसनासाठी जमीन देण्यास नकार
धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले; कसाऱ्याजवळ अपघात; तिघांचा मृत्यू, तीन पलटी मारल्यामुळे कारचा चेंदामेंदा
शहा पुरस्कृत मिंधे गटाचा खरा चेहरा उघड, मराठी माणसाच्या आंदोलनाला मुंबईत परवानगी देऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र!