अभ्युदय नगर पुनर्विकासासाठी तीन कंपन्यांमध्ये स्पर्धा

अभ्युदय नगर पुनर्विकासासाठी तीन कंपन्यांमध्ये स्पर्धा

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी तीन विकासकांमध्ये स्पर्धा असणार आहे. येत्या 8 सप्टेंबर रोजी म्हाडा तांत्रिक निविदा खुली करणार असून त्यानंतर अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची वित्तीय निविदा खुली करण्यात येईल. त्यानंतर विकासकाची नेमणूक करण्यात येणार आहे.

अभ्युदय नगरला सद्यस्थितीत 48 इमारती असून 208 चौरस फुटांची 3410 घरे आहेत. या वसाहतीच्या पुनर्विकासाची बांधकाम व विकास या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी म्हाडाने सुरुवातीला गेल्या वर्षी निविदा काढली होती. पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन घराचे चटई क्षेत्रफळ किमान 635 चौरस फूट असावे, अशी अट म्हाडाने घातली होती. सहा वेळा मुदतवाढ देऊनदेखील एकाही विकासकाने निविदा भरली नाही. त्यामुळे म्हाडाने पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ 635वरून 620पर्यंत कमी करत विकासक नेमण्यासाठी 29 मे रोजी नव्याने निविदा मागवल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बोरामणीजवळ एसटीचा अपघात; 16 जखमी बोरामणीजवळ एसटीचा अपघात; 16 जखमी
    ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसने कंटेनरला ठोकरले असून, यात 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बिदर-पंढरपूर या बसला अपघात झाला
निर्माल्यात गेलेली 2 लाखांची चेन बाप्पाच्या कृपेने परत मिळाली, सफाई कामगार ठरले विघ्नहर्ता
नवी मुंबईत उरलेले अन्नधान्य, खाद्यपदार्थ नारायण गडावर जाणार; मराठा आंदोलकांसाठी आली विक्रमी शिदोरी
डोंबिवलीत भूमाफियांनी तलाठी कार्यालय फोडले; कागदपत्रे पळवण्याचा प्रयत्न, नवे टाळे लावून पोबारा
सरकारने पुन्हा फसवले; हनुमान कोळीवाडावासीयांना क्लस्टरमध्ये कोंबणार, पुनर्वसनासाठी जमीन देण्यास नकार
धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले; कसाऱ्याजवळ अपघात; तिघांचा मृत्यू, तीन पलटी मारल्यामुळे कारचा चेंदामेंदा
शहा पुरस्कृत मिंधे गटाचा खरा चेहरा उघड, मराठी माणसाच्या आंदोलनाला मुंबईत परवानगी देऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र!