निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपचे दोन नेते लोकशाही नष्ट करू इच्छितात – तेजस्वी यादव

निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपचे दोन नेते लोकशाही नष्ट करू इच्छितात – तेजस्वी यादव

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेली मतदार हक्क यात्रेचा समारोप बिहारमधील पाटण्यातील गांधी मैदानात झाला. या समारोपाच्या कार्यक्रमात राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाजपा गंभीर आरोप केले. भाजप देशात राजेशाही आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी बोलताना बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, “बिहार ही लोकशाहीची जननी आहे. परंतु, भाजपाचे दोन नेते निवडणूक आयोगाशी संगनमत करून या लोकशाहीच्या पवित्र भूमीतून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.” त्यांनी उपस्थितांना प्रश्न विचारला, “तुम्हाला लोकशाही हवी आहे की राजेशाही?”

तेजस्वी यांनी भाजपावर जोरदार टीका करताना म्हटले, “हे लोक बिहारी जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारखाने गुजरातमध्ये उभारायचे आणि मते बिहारमधून मागायची. आपली मते कापू देऊ नका.”

तेजस्वी यादव यांनी बिहारमधील नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजन सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “या सरकारचे एक इंजन गुन्हेगारीचे आहे, तर दुसरे भ्रष्टाचाराचे. मुख्यमंत्री नीतीश कुमार हे भ्रष्टाचाराचे भीष्म पितामह बनले आहेत. मंत्र्यांच्या घरी सकाळ-संध्याकाळ भेटी होतात. त्यांच्या विभागातील अभियंते पकडले जातात, तेव्हा कोट्यवधी रुपये जाळले जातात. असे प्रकार सर्रास सुरू आहेत.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रात्री झोपले ते उठलेच नाहीत, सकाळी दरवाजा उघडला असता पाचही जण बेशुद्धावस्थेत; नेमकं काय घडलं? रात्री झोपले ते उठलेच नाहीत, सकाळी दरवाजा उघडला असता पाचही जण बेशुद्धावस्थेत; नेमकं काय घडलं?
सोलापूरात एक खळबळजक घटना उघडकीस आली आहे. लष्कर भागात राहणारे एक कुटुंब नेहमीप्रमाणे रात्री झोपलं. सकाळी उशीरपर्यंत कुणी उठलं नाही....
चेन्नईहून अंदमानला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान माघारी वळवले, खराब हवामानामुळे लँडिंग अशक्य
मनात सतत घाणेरडे विचार येतात? शरीरात असू शकते या 5 व्हिटॅमिन्सची कमतरता
धक्कादायक : देशातील 11 टक्के लोकांना आयुष्यभर कॅन्सरचा धोका, काय आहे कारण ?
साखर खाल्ल्यामुळे केस लवकर पांढरे होतात का?
त्वचेवर पांढरे डाग आहेत, घाबरु नका…, तज्ज्ञांकडून जाणून घ्या संपूर्ण माहिती
मी मेलो तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही – मनोज जरांगे पाटील