आता हायड्रोजन बॉम्ब फोडल्यानंतर पंतप्रधान मोदींना चेहरा लपवण्यासाठीही जागा उरणार नाही, राहुल गांधी यांचे सूचक विधान

आता हायड्रोजन बॉम्ब फोडल्यानंतर पंतप्रधान मोदींना चेहरा लपवण्यासाठीही जागा उरणार नाही, राहुल गांधी यांचे सूचक विधान

ज्या शक्तींनी महात्मा गांधींना मारलं, तीच शक्ती संविधान नष्ट करण्याच्या तयारीत आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तसेच मतचोरीवर झालेली पहिली पत्रकार परिषद तर फक्त अॅटम बॉम्ब होती आता हायड्रोजन बॉम्ब फोडल्यानंतर पंतप्रधान मोदींना चेहरा लपवण्यासाठीही जागा उरणार नाही, असे सूचक विधान राहुल गांधी यांनी केले आहे.

बिहारमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ज्या शक्तींनी महात्मा गांधींना मारलं, तीच शक्ती संविधान नष्ट करण्याच्या तयारीत आहेत. काहीही झालं तरी आम्ही त्यांना संविधानाची हत्या करू देणार नाही. म्हणून बिहारमध्ये आम्ही यात्रा सुरू केली आणि जनतेने आम्हाला साथ दिली. सगळे तरुण आमच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा व्होट चोर गद्दी छोड हा नारा पसरला आहे. आणि भाजपचे लोक आम्हाला काळे झेंडे दाखवत होते. भाजपच्या लोकांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही अॅटम बॉम्बचे नाव ऐकलंय का त्याच्यापेक्षा हायड्रोजन बॉम्ब असतो. आधी आम्ही फक्त अॅटम बॉम्ब दाखवला होता आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब दाखवणार आहोत. भाजपने जी मतांची चोरी केली होती ती सगळ्या देशाला कळणार आहे. बिहारची माती ही क्रांतीकारी आहे, बिहारने संपूर्ण देशाला संदेश दिला आहे की मतांची चोरी होऊ देणार नाही. या हायड्रोजन बॉम्ब नंतर मोदी देशाला आपला चेहराही दाखवू शकणार नाहीत असेही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत मराठा बांधवांसाठी शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी उघडले अन्नछत्र मुंबईत मराठा बांधवांसाठी शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी उघडले अन्नछत्र
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मुंबईत सुरू आहे. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने आंदोलक आले आहेत. शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर...
आता हायड्रोजन बॉम्ब फोडल्यानंतर पंतप्रधान मोदींना चेहरा लपवण्यासाठीही जागा उरणार नाही, राहुल गांधी यांचे सूचक विधान
दक्षिण मुंबईला छावणीचे स्वरूप, मंत्रालयाबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था
कच्चे न्यूडल्स खाल्ले अन् जीवच गेला; कधीच करू नका अशी चूक
Gen Z ना होत आहेत ‘हे’ 5 गंभीर आजार, तरूण्यातच मृत्यूचा धोका वाढण्याची शक्यता
24 तासांत मुंबईतून सहा अल्पवयीन मुलं आणि मुली बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू
आंदोलकांची दिशाभूल करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा; मनोज जरांगे यांची मागणी