सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी

सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी

>> राजेश चुरी

राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे, पण साखर सम्राटांना खास करून सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदारांच्या साखर कारखान्यांना खूश करण्याचे महायुती सरकारचे धोरण आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या 23 ते 24 साखर कारखान्यांना राज्य सरकारने आतापर्यंत सुमारे 4 हजार कोटी रुपयांची थकहमी दिल्याची माहिती पुढे आली आहे.

वास्तविक थकहमीच्या मुद्दय़ावरून वित्तमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत, पण तरीही भाजपला मदत करणाऱ्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना थकहमी दिली जात असल्याचे पुढे आले आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून कर्ज देण्यात येते, मात्र या कर्जासाठी राज्य सरकारची थकहमी आवश्यक असते. 2024-25 च्या गाळप हंगामासाठी राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन लोनअंतर्गत मिळालेली रक्कम वितरित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. त्यानंतर आतापर्यंत महायुती सरकारने 23 ते 24 सहकारी साखर कारखान्यांना किमान चार हजार कोटी रुपयांची थकहमी दिल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली.

कारखान्यांच्या अध्यक्षांना खूश केले

आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलेल्या राज्यातल्या साखर कारखान्यांना राज्य सरकारने खूश केले. त्यांच्यावर खैरात केली आहे. कारखान्याचे कर्ज थकले तर अध्यक्षांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार राज्य बँकेला मिळणार होते, पण सहकार विभागाने मध्यंतरी ही अट बदलली असून कर्ज व व्याजाच्या परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक व सामूहितरीत्या जबाबदार राहील अशी सुधारित अट घातली आहे. त्यामुळे कर्जफेड न केल्यास यापुढे साखर कारखान्यांचे अध्यक्ष जबाबदार राहाणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

राजगड कारखान्यावर साखर पेरणी

पुणे जिह्यातल्या भोर तालुक्यातील राजगड साखर कारखान्याची सूत्रे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे आहेत. संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बंद पडलेल्या या साखर कारखान्याला 467 कोटी रुपयांचे खेळते भांडवल देण्याचा प्रस्ताव मागील मंत्रिमंडळ बैठकीत सादर झाला होता, पण वित्तमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव रेटून नेला आणि मंजुरी दिली. यापूर्वी संग्राम थोपटे यांच्या कारखान्याच्या मदतीचा प्रस्ताव सादर झाला होता. पण लोकसभा निवडणुकीत महायुतीला मदत केली नाही म्हणून राजगड साखर कारखान्याच्या मदतीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. पण भाजप प्रवेशामुळे आता मार्ग मोकळा झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;