भूस्खलन, ढगफुटी आणि पूर; हिमाचल प्रदेश आपत्तीग्रस्त राज्य घोषित

भूस्खलन, ढगफुटी आणि पूर; हिमाचल प्रदेश आपत्तीग्रस्त राज्य घोषित

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलन, ढगफुटी आणि पूर यामुळे मोठं नुकसान झालं आहे. यातच हिमाचल प्रदेशाला अधिकृतपणे ‘आपत्तीग्रस्त राज्य’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही घोषणा राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी सोमवारी विधानसभेत केली. या घोषणेमुळे राज्याला केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यापासून हिमाचल प्रदेशात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने राज्याला हादरवून सोडले आहे. २१ ऑगस्टपासून पुन्हा सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे चंबा, कुल्लू, लाहुल स्पीती, मंडी, शिमला, कांगडा आणि हमीरपूर या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे सुमारे ३ लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, भूस्खलन, पूर, ढगफुटी आणि इतर हवामानाशी संबंधित घटनांमुळे १६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूणच पावसाशी संबंधित आणि रस्ता अपघातांसह ३२० लोकांचा जीव गेला आहे. यातच आज हिमाचल प्रदेशाला अधिकृतपणे ‘आपत्तीग्रस्त राज्य’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रात्री झोपले ते उठलेच नाहीत, सकाळी दरवाजा उघडला असता पाचही जण बेशुद्धावस्थेत; नेमकं काय घडलं? रात्री झोपले ते उठलेच नाहीत, सकाळी दरवाजा उघडला असता पाचही जण बेशुद्धावस्थेत; नेमकं काय घडलं?
सोलापूरात एक खळबळजक घटना उघडकीस आली आहे. लष्कर भागात राहणारे एक कुटुंब नेहमीप्रमाणे रात्री झोपलं. सकाळी उशीरपर्यंत कुणी उठलं नाही....
चेन्नईहून अंदमानला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान माघारी वळवले, खराब हवामानामुळे लँडिंग अशक्य
मनात सतत घाणेरडे विचार येतात? शरीरात असू शकते या 5 व्हिटॅमिन्सची कमतरता
धक्कादायक : देशातील 11 टक्के लोकांना आयुष्यभर कॅन्सरचा धोका, काय आहे कारण ?
साखर खाल्ल्यामुळे केस लवकर पांढरे होतात का?
त्वचेवर पांढरे डाग आहेत, घाबरु नका…, तज्ज्ञांकडून जाणून घ्या संपूर्ण माहिती
मी मेलो तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही – मनोज जरांगे पाटील