लग्न म्हणजे एकत्र नांदणे, पती-पत्नी पूर्ण स्वातंत्र्याचा दावा करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

लग्न म्हणजे एकत्र नांदणे, पती-पत्नी पूर्ण स्वातंत्र्याचा दावा करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

पती-पत्नी विवाहबंधनात अडकले असताना पूर्ण स्वातंत्र्याचा दावा करू शकत नाहीत. लग्न म्हणजे पती-पत्नीने एकत्र नांदणे. त्यामुळे जोडीदाराशिवाय पूर्णपणे स्वतंत्र असल्याचा दावा पती किंवा पत्नी कोणीही करू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका प्रकरणात दिला. जे जोडीदार विवाहानंतर एकमेकांवर विसंबून राहण्यास तसेच एकत्र नांदण्यास तयार नसतात, त्यांनी विवाहबंधनात अडकूच नये, असा इशारा न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठाने दिला आहे.

विवाह म्हणजे दोन आत्म्यांचे, दोन व्यक्तींचे एकत्र येणे. कोणताही पती किंवा पत्नी मला माझ्या जोडीदारापासून पूर्णपणे स्वतंत्र राहायचे आहे, असे म्हणू शकत नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती नागरत्न यांनी सुनावणीदरम्यान केली. तसेच खंडपीठाने मुलांबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. जर पती-पत्नी एकत्र आले तर ते मुलांसाठी चांगले होईल. मुलं लहान आहेत. त्यांचा काय दोष? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.

पती-पत्नी दोघेही सिंगापूरमध्ये नोकरी करत होते. परंतु पत्नी मुलांसह सिंगापूरला पतीकडे परतण्यास नकार देत आहे. पत्नीने आरोप केला की पतीच्या वागण्यामुळे तिला सिंगापूरला परतणे कठीण झाले आहे. ती कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय मुलांचे संगोपन करत आहे.न्यायालयाने पतीला पत्नी आणि मुलांसाठी पाच लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काय सांगता,पाणी पिण्यामुळे देखील मृत्यू होऊ शकतो? पाण्याचीही होते विषबाधा, तुम्हीही करताय का तीच चूक काय सांगता,पाणी पिण्यामुळे देखील मृत्यू होऊ शकतो? पाण्याचीही होते विषबाधा, तुम्हीही करताय का तीच चूक
चांगल्या आरोग्यासाठी आणि चमकदार त्वचेसाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. कारण ‘पाणी हेच जीवन आहे’ असं म्हटलं...
Thane News – शहापूरमध्ये घडली दुर्दैवी घटना, विसर्जनावेळी 5 तरुण बुडाले; एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता तर दोघांना वाचवण्यात यश
डेंग्यू बरा झाल्यानंतरही शरीरावर करतो असा परिणाम; ही लक्षणे धोकादायक
चंद्रपूरमध्ये विसर्जन मिरवणुकीत भाजपमधील कलह चव्हाट्यावर, मुनगंटीवार आणि जोरगेवारांचे वेगवेगळे मंडप
Jalna Honor Killing – बदनापूर तालुक्यात दावलवाडीत बापाने लेकीला संपवले, गळफास घेतल्याचा रचला बनाव
Mega Block News – मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची रविवारी तारांबळ उडणार, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
Gujarat – पावागडमध्ये मोठी दुर्घटना, मालवाहू रोपवे तुटून 6 जणांचा मृत्यू