50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्यात अमित शहा यांची सर्वाधिक बदनामी झाली; संजय राऊत यांचे स्पष्ट मत

50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्यात अमित शहा यांची सर्वाधिक बदनामी झाली; संजय राऊत यांचे स्पष्ट मत

शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सिडकोतील 50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्यावर परखड मत व्यक्त केले. अमित शहा आणत असलेल्या कायद्याचा पहिला प्रयोग संजय शिरसाठ यांच्यावर व्हायला हवा, असे ते म्हणाले. हा स्थानिक राजकारणाचा विषय नसून हा राज्यातील ऐतिहासिक भूखंड घोटाळा आहे, असेही ते म्हणाले.

सिडकोमध्ये 50 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे की नाही, याचे उत्तर द्यावे. बिवलकर यांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून, बेकायदेशीररित्या, ते कायदेशीर हक्कदार नसताना 5 हजार एकर वनजमीन ज्याप्रकारे 25 दिवसात देण्याचा उपक्रम सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी केला. हे त्यांचे सर्व आदेश, हे सर्व सरकारी कागदपत्रे जनतेसाठी खुले आहेत. त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. आता मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा नवीन कायदा अमित शहा आणू इच्छित आहेत, तर तो पहिला प्रयोग संजय शिरसाठ यांच्यावर होण्याची गरज आहे. गणेश नाईक त्या भागातील प्रमुख नेते आहेत. ते भाजपचे मंत्री आहेत. हे स्थानिक राजकारण नाही. 50 हजार कोटींचा भूखंड घोटाळा हा राज्यातील ऐतिहासिक भूखंड घोटाळा आहे. मुंबईत गेल्यावर या विषयावर पुढे काय करायचे, याची आमची महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबतची कागदपत्रे मागवून घेतली आहेत.

त्यांनी शेण खाल्ले आहे, स्वतः शेण खायचे आणि दुसऱ्यांच्या तोडांचा वास घ्यायचा असे त्यांचे सुरू आहे. 50 हजार कोटींचा घोटाळा झालेला आहे. त्यातील 20 हजार कोटी एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाठ यांना मिळाले आहेत. त्यातले 10 हजार कोटी दिल्लीतील बॉसपर्यंत आलेत, असे त्यांचे नेते सांगत आहेत. त्यामुळे यात सर्वात जास्त बदनामी अमित शहा यांची झालेली आहे. ही आपण स्वतः त्यांना सांगितले आहे, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डेंग्यू बरा झाल्यानंतरही शरीरावर करतो असा परिणाम; ही लक्षणे धोकादायक डेंग्यू बरा झाल्यानंतरही शरीरावर करतो असा परिणाम; ही लक्षणे धोकादायक
पावसाळा म्हटलं की आजार हे आलेच त्यात पावसाळ्यात डासांमुळे होणार आजार तर जास्तच जोर धरतात. त्यातील एक आजार म्हणजे डेंग्यू....
चंद्रपूरमध्ये विसर्जन मिरवणुकीत भाजपमधील कलह चव्हाट्यावर, मुनगंटीवार आणि जोरगेवारांचे वेगवेगळे मंडप
Jalna Honor Killing – बदनापूर तालुक्यात दावलवाडीत बापाने लेकीला संपवले, गळफास घेतल्याचा रचला बनाव
Mega Block News – मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची रविवारी तारांबळ उडणार, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
Gujarat – पावागडमध्ये मोठी दुर्घटना, मालवाहू रोपवे तुटून 6 जणांचा मृत्यू
Mumbai Accident : लालबागमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; 2 मुलांना चिरडले, चिमुकलीचा मृत्यू
पिंट्या असो की तात्या… थोडं लक्ष द्या… वयानुसार रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? घ्या जाणून