राज्यातील समस्येबाबत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट होत असेल, तर त्यात अयोग्य काय? संजय राऊत यांचा सवाल

राज्यातील समस्येबाबत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट होत असेल, तर त्यात अयोग्य काय? संजय राऊत यांचा सवाल

शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबात चर्चा करण्याची गरज नाही. राज्याच्या समस्यांबाबत दोन नेते भेटत असतील, तर त्यात अयोग्य काय आहे? असा सवालही त्यांनी केला. राज्यातील दोन प्रमुख नेते भेटत आहेत. त्यात एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर दुसरे राज ठाकरे आहेत, दोन नेते भेटत असतील तर त्यात अयोग्य काय आहे. कशासाठी भेट होतोय. काय चर्चा झाली , हे तेच नेते सांगू शकतात. त्या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असेल असे तुम्ही म्हणता, तर याबाबत त्या नेत्यांनीच सांगितले पाहिजे. राज ठाकरे यांचा स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा पाहता, ते या भेटीबाबत स्पष्टपणे बोलतील, असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणे म्हणजे राजकीय अपराध नाही. उद्या आमचे किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राज्यासंदर्भात किंवा समाजिक काही काम असेल तर त्यांनीही भेटले पाहिजे. राज्याचा मुख्यमंत्री एका गटाचा किंवा पक्षाचा नसतो. ते राज्यातील 11 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांनीही या पदाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान हे भाजपचे पंतप्रधान आहेत, असे आम्ही म्हणतो. त्याला कारणे आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी एका गटाचा किंवा पक्षाचा मुख्यमंत्री नाही, ही प्रतिमा त्यांनी पुसली पाहिजे. आता मिंधे गट त्यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही. ते अजूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मानतात. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे आम्ही मानतो, असे ते म्हणाले.

बेस्ट पतपेढीची निवडणूक ही दिल्लीतील चर्चेचा विषय ठरू शकत नाही. ती पतपेढी आमच्याकडे नव्हती. काही लोकं एकत्र येत त्यांनी निवडणूक लढवली असेल. हा एवढा गांभीर्याने घेण्याचा विषय नाही. या विषयावर मी बोलत नाही. याबाबत बोलण्यासाठी आमचे वेगळे प्रवक्ते आणि नेते आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली, त्यांना हे प्रश्न विचारण्याची गरज आहे. हा विषयच आपल्याला माहिती नसल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;