दोन लाख नोकऱ्यांवर गंडांतर, ऑनलाइन गेमिंग कंपन्यांची झोप उडाली

दोन लाख नोकऱ्यांवर गंडांतर, ऑनलाइन गेमिंग कंपन्यांची झोप उडाली

नुकतेच ऑनलाईन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेटरी बिल 2025 कॅबिनेटने मंजूर केले आहे. ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगाराला प्रोत्साहन देणाऱया प्लॅटफॉर्मला आळा घालण्यासाठी सरकारने बेटिंग ऍप्सविरोधात कंबर कसली आहे. सरकारने उचललेल्या या पावलामुळे ऑनलाईन गेमिंग कंपन्यांची झोप उडाली आहे. ऑनलाइन गेमिंग कंपन्या आणि त्यांच्या प्रमुख संघटना, ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन, ई-गेमिंग फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ इंडिया फँटसी स्पोर्टस् यांनी गृहमंत्री अमित शहा यांना एक संयुक्त पत्र लिहिले आहे. या पत्रानुसार, जर हे विधेयक मंजूर झाले, तर देशभरातील 2 लाखांहून अधिक नोकऱया संपुष्टात येतील आणि 400 हून जास्त गेमिंग कंपन्या बंद पडतील. यामुळे ‘डिजिटल इंडिया’च्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसेल, असेही या संघटनांनी म्हटले आहे. करोडो गेमर्स दुसऱया अवैध बेटिंग प्लॅटफॉर्मवर आणि ऑपरेटर्सकडे वळतील. करोडो लोकांना रोजगार देणारी इंडस्ट्री संकटात येईल, याकडे ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने लक्ष वेधलेय.

देशात ऑनलाइन गेमिंग उद्योग सध्या वेगाने वाढत आहे. हिंदुस्थानात ऑनलाइन गेम खेळणाऱयांची संख्या 2020 मध्ये 36 कोटी होती, ती 2024 मध्ये 50 कोटींहून अधिक झाली आहे. या उद्योगाचे एकूण मूल्य 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यातून दरवर्षी 31 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. तसेच हा उद्योग सरकारला 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर देतो. सध्या या उद्योगाची वार्षिक वाढ सुमारे 20 टक्के आहे.

गेमिंग कंपन्यांनी सरकारला थेट बंदी घालण्याऐवजी एक कठोर, पण प्रगतीशील नियमन (रेग्युलेशन) आणण्याची विनंती केली आहे. यामुळे युजर्सची सुरक्षाही सुनिश्चित होईल आणि उद्योगालाही वाढण्याची संधी मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी अमित शहा यांच्याकडे या विषयावर तातडीने बैठक घेण्याची विनंती केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डेंग्यू बरा झाल्यानंतरही शरीरावर करतो असा परिणाम; ही लक्षणे धोकादायक डेंग्यू बरा झाल्यानंतरही शरीरावर करतो असा परिणाम; ही लक्षणे धोकादायक
पावसाळा म्हटलं की आजार हे आलेच त्यात पावसाळ्यात डासांमुळे होणार आजार तर जास्तच जोर धरतात. त्यातील एक आजार म्हणजे डेंग्यू....
चंद्रपूरमध्ये विसर्जन मिरवणुकीत भाजपमधील कलह चव्हाट्यावर, मुनगंटीवार आणि जोरगेवारांचे वेगवेगळे मंडप
Jalna Honor Killing – बदनापूर तालुक्यात दावलवाडीत बापाने लेकीला संपवले, गळफास घेतल्याचा रचला बनाव
Mega Block News – मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची रविवारी तारांबळ उडणार, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
Gujarat – पावागडमध्ये मोठी दुर्घटना, मालवाहू रोपवे तुटून 6 जणांचा मृत्यू
Mumbai Accident : लालबागमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; 2 मुलांना चिरडले, चिमुकलीचा मृत्यू
पिंट्या असो की तात्या… थोडं लक्ष द्या… वयानुसार रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? घ्या जाणून