आपण पुन्हा मध्ययुगीन काळात जगत आहोत, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना अटक करण्याच्या विधेयकावर राहुल गांधी यांची टीका

आपण पुन्हा मध्ययुगीन काळात जगत आहोत, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना अटक करण्याच्या विधेयकावर राहुल गांधी यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक, 2025 सादर केले. त्यावरून आपण मध्ययुगीन काळात जगत आहोत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.तसेच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची एक कहाणी आहे असेही राहुल गांधी म्हणाले.

दिल्लीत एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, भाजपने मांडलेल्या नवीन विधेयकाबाबत खूप हालचाली सुरू आहेत. आपण पुन्हा मध्ययुगीन काळात जात आहोत, जिथे राजा हवं त्याला हटवू शकत होता. निवडून आलेल्या व्यक्ती म्हणजे काय, याची काहीच संकल्पना नाही. त्याला तुमचा चेहराच आवडला नाही, तर त्याच्या मागे ईडी लावली जाते. आणि मग लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या व्यक्तीला 30 दिवसांत संपवून टाकले जाते. आणि आपण हेही विसरू नये की आपण नवा उपराष्ट्रपती का निवडत आहोत. कालच मी कोणाशी तरी बोलत होतो आणि मी विचारलं, “की जुने उपराष्ट्रपती कुठे गेले?” ते गेले…”
तसेच ज्या दिवशी उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, त्या दिवशी वेणुगोपालजींनी मला फोन केला आणि म्हणाले, “उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामागे मोठी गोष्ट आहे. तुमच्यापैकी काहींना ती माहिती असेल, काहींना नसेल, पण त्यामागे एक कहाणी आहे. आणि त्यानंतर आणखी एक कहाणी आहे की ते लपून का बसले आहेत. भारताचे उपराष्ट्रपती अशा परिस्थितीत का आहेत की जिथे ते एक शब्दही बोलू शकत नाहीत? अचानक, जे व्यक्ती राज्यसभेत नेहमी धडाकेबाज पद्धतीने बोलायचे, ते पूर्णपणे गप्प झाले आहेत. तर हा तो काळ आहे, ज्यात आपण जगत आहोत असेही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;