आपण पुन्हा मध्ययुगीन काळात जगत आहोत, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना अटक करण्याच्या विधेयकावर राहुल गांधी यांची टीका

आपण पुन्हा मध्ययुगीन काळात जगत आहोत, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना अटक करण्याच्या विधेयकावर राहुल गांधी यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक, 2025 सादर केले. त्यावरून आपण मध्ययुगीन काळात जगत आहोत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.तसेच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची एक कहाणी आहे असेही राहुल गांधी म्हणाले.

दिल्लीत एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, भाजपने मांडलेल्या नवीन विधेयकाबाबत खूप हालचाली सुरू आहेत. आपण पुन्हा मध्ययुगीन काळात जात आहोत, जिथे राजा हवं त्याला हटवू शकत होता. निवडून आलेल्या व्यक्ती म्हणजे काय, याची काहीच संकल्पना नाही. त्याला तुमचा चेहराच आवडला नाही, तर त्याच्या मागे ईडी लावली जाते. आणि मग लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या व्यक्तीला 30 दिवसांत संपवून टाकले जाते. आणि आपण हेही विसरू नये की आपण नवा उपराष्ट्रपती का निवडत आहोत. कालच मी कोणाशी तरी बोलत होतो आणि मी विचारलं, “की जुने उपराष्ट्रपती कुठे गेले?” ते गेले…”
तसेच ज्या दिवशी उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, त्या दिवशी वेणुगोपालजींनी मला फोन केला आणि म्हणाले, “उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामागे मोठी गोष्ट आहे. तुमच्यापैकी काहींना ती माहिती असेल, काहींना नसेल, पण त्यामागे एक कहाणी आहे. आणि त्यानंतर आणखी एक कहाणी आहे की ते लपून का बसले आहेत. भारताचे उपराष्ट्रपती अशा परिस्थितीत का आहेत की जिथे ते एक शब्दही बोलू शकत नाहीत? अचानक, जे व्यक्ती राज्यसभेत नेहमी धडाकेबाज पद्धतीने बोलायचे, ते पूर्णपणे गप्प झाले आहेत. तर हा तो काळ आहे, ज्यात आपण जगत आहोत असेही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
>> विजय जोशी सन 1983 व 89 साली त्यावेळच्या बिलोली, देगलूर व धर्माबाद या तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि पोचमपाड अर्थात...
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल
कापसाला कीड, सोयाबीनवर ‘उंट अळी’चा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर
वाशीला जे गुलाल उधळत होते त्यांना फडणवीसांनी साधं चर्चेतही घेतलं नाही, संजय राऊत यांचा टोला
धोकादायक सभा अपार्टमेंट खचली; नालासोपाऱ्यातील 40 कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले