वाशीला जे गुलाल उधळत होते त्यांना फडणवीसांनी साधं चर्चेतही घेतलं नाही, संजय राऊत यांचा टोला

वाशीला जे गुलाल उधळत होते त्यांना फडणवीसांनी साधं चर्चेतही घेतलं नाही, संजय राऊत यांचा टोला

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण आंदोलन केले. या आंदोलनाला यशही आले आणि सरकारने बहुतेक मागण्या मान्य केल्याने हजारो मुंबईत आलेले हजारो आंदोलक परत माघारी गेले आहेत. या आंदोलकांसोबतच्या चर्चेवेळी महायुती सरकारमधले फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने पुढे दिसले व इतर दोन उपमुख्यमंत्री मात्र या चर्चेत दिसले नसल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटाला सणसणीत टोला लगावला आहे. ”मागच्या वेळी ज्यांनी वाशीला गुलाल उधळत जल्लोष केला होता त्यांना यावेळी फडणवीसांनी साधं चर्चेतही घेतलं नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

”सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील चर्चेत विरोधी पक्षातील नेत्यांना सहभागी करून घेतलं नाही. किंबहुना वाशीला जे गुलाल उधळत होते त्यांना देखील चर्चेत घेतलं नाही. फडणवीसांनी या वाटाघाटी फक्त भाजपच्या छत्रछायेखाली होतील व त्याचे श्रेय फक्त भाजपला मिळेल याची काळजी घेतली. जरांगे पाटील खुष होऊन गेले असतील याचा अर्थ त्यांच्या मागण्या मान्य झाल्या असतील. शिवसेना या क्षणी आपलं मत मांडणार नाही. मराठा तरुणांना याचा फायदा होणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो”, असे संजय राऊत म्हणाले.

मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीने मंत्रीमंडळात जागा दिली नव्हती. ओबीसींचे नेते म्हणून भुजबळ यांना मोदींनी विशेष लक्ष घालून मंत्रीमंडळात घेतले. ते मंत्रीमंडळात आहेत ही नरेंद्र मोदींची कृपा आहे. मोदी म्हणत अशतात की मी ओबीसींचा नेता आहे. खरंतर पंतप्रधानांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही. भुजबळ ओबीसी असल्याने मोदींनी सर्वांचा विरोध डावलून त्यांना मंत्रीमडंळात घेतलं. त्यामुळे आता भुजबळ जर नाराज असतील तर ते त्या संदर्भात मोदींची भेट घेतील व चर्चा करतील. संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमध्ये काही ना काही करत आहेत. सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगेंनी माघार घेऊ नये व फडणवीसांचं सरकार अडचणीत यावं”, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;