धोकादायक सभा अपार्टमेंट खचली; नालासोपाऱ्यातील 40 कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले

धोकादायक सभा अपार्टमेंट खचली; नालासोपाऱ्यातील 40 कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले

विरारमधील रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळून 17 जण मृत्युमुखी पडल्याच्या घटनेस आठवडा उलटत नाही तोच नाल सोपाऱ्यातील धोकादायक सभा अपार्टमेंट खचल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेने तातडीने त्यातील 40 कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले असून बाजूच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या 114 जणांचेदेखील अन्यत्र स्थलांतर केले आहे. दरम्यान धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

नालासोपारा पूर्वेच्या रेहमतनगर परिसरात 20 वर्षे जुनी सभा अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत आहे. या इमारतीत 40 कुटुंबे राहत आहेत. इमारत जुनी झाल्याने पालिकेने धोकादायक ठरवली होती. मात्र तरीही यात नागरिक वास्तव्य करीत होते. मंगळवारी दुपारी याच इमारतीच्या एका बाजूला दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानकपणे ती दुसऱ्या बाजूला कलंडली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीती निर्माण झाली.

मदरसा, सभागृहात व्यवस्था
इमारत कलंडल्याचे समजताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यातील रहिवाशांना तातडीने बाहेर काढले. पालिकेने खचलेल्या इमारतीमधून 125 जणांना व त्याला लागूनच असलेल्या इमारतीमधून 114 जणांचे स्थलांतर केले आहे. त्यांची जवळच्या मदरसा व एका सभागृहात तात्पुरती व्यवस्था केली असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं
अनेकांना झोपण्याआधी अंघोळ करण्याची किंवा सकाळी काही नाश्ता करून मग थोड्यावेळाने अंघोळ करण्याची सवय असते. पण काहीजण कधी कधी काही...
Video नांदेडमधील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाची वाट खडतर, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे भाविकांचे हाल
GSTच्या नावाखाली मध्यमवर्गीयांची कमाई चुरून खाल्ल्यावर आता केंद्राला बदल करण्याचे सुचले, अंबादास दानवे यांची टीका
नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल