Ratnagiri News – पावसाचा बागायतदारांना मोठा फटका, नुकसान भरपाई द्यावी; बागायतदारांची शासनाकडे मागणी

Ratnagiri News – पावसाचा बागायतदारांना मोठा फटका, नुकसान भरपाई द्यावी; बागायतदारांची शासनाकडे मागणी

थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना विना अट कर्जमाफी मिळावी. यंदाच्या हंगामात पाऊस पडल्यामुळे आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी. माकडांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, त्यामुळे माकडांचा बंदोबस्त करावा. पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी विम्याचे निकष बदलावे, अशा मागण्या आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर निवेदनाद्वारे मांडल्या. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आंबा बागायतदारांनी दिलेल्या निवेदनात विविध मागण्या मागितल्या आहेत. त्यामध्ये २०२४-२५ वर्षाकरिता फळपीक विम्यासाठी ई-पीक पहाणीची अट रद्द करावी. महावितरणच्या स्मार्ट मीटरला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवू नयेत. आंबा,काजू,नारळ आणि सुपारीच्या पीकांना हमी भाव मिळावा. खते आणि औषधे सवलतीच्या दरात मिळावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, अशोक भाटकर, दीपक उपळेकर, सुयोग आंग्रे, किरण तोडणकर, अनंत आंग्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, शहर प्रमुख प्रशांत सांळुखे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बोरामणीजवळ एसटीचा अपघात; 16 जखमी बोरामणीजवळ एसटीचा अपघात; 16 जखमी
    ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसने कंटेनरला ठोकरले असून, यात 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बिदर-पंढरपूर या बसला अपघात झाला
निर्माल्यात गेलेली 2 लाखांची चेन बाप्पाच्या कृपेने परत मिळाली, सफाई कामगार ठरले विघ्नहर्ता
नवी मुंबईत उरलेले अन्नधान्य, खाद्यपदार्थ नारायण गडावर जाणार; मराठा आंदोलकांसाठी आली विक्रमी शिदोरी
डोंबिवलीत भूमाफियांनी तलाठी कार्यालय फोडले; कागदपत्रे पळवण्याचा प्रयत्न, नवे टाळे लावून पोबारा
सरकारने पुन्हा फसवले; हनुमान कोळीवाडावासीयांना क्लस्टरमध्ये कोंबणार, पुनर्वसनासाठी जमीन देण्यास नकार
धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले; कसाऱ्याजवळ अपघात; तिघांचा मृत्यू, तीन पलटी मारल्यामुळे कारचा चेंदामेंदा
शहा पुरस्कृत मिंधे गटाचा खरा चेहरा उघड, मराठी माणसाच्या आंदोलनाला मुंबईत परवानगी देऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र!