Konkan Rain Update: राजापूरात पूर, व्यापाऱ्यांची पळापळ

Konkan Rain Update: राजापूरात पूर, व्यापाऱ्यांची पळापळ

गेले चार दिवस मुसळधार पावसामुळे झोडपून काढले होते. आज सकाळी कोदवली आणि अर्जुना नद्यांना पूर आला. पुराचे पाणी राजापूर बाजारपेठेत शिरले. राजापूरात पूर आल्याने एकच हाहाःकार उडाला आहे.

राजापूर नगर परिषदेने भोंगा वाजवून सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरताच व्यापाऱ्यांनी तात्काळ सामान हलविण्यास सुरूही केली. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १५८ मिमी पाऊस पडला. त्यामध्ये मंडणगड -147.75 मिमी,खेड – 172.14मिमी,दापोली – 181.85 मिमी,चिपळूण – 162.44 मिमी,गुहागर – 130.60 मिमी, संगमेश्वर – 138.08 मिमी,रत्नागिरी – 140.55 मिमी,लांजा – 166.50 मिमी आणि राजापूर – 184.12 मिमी पाऊस पडला.

पाच नद्यांचे रौद्ररूप

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा हाहाःकार सुरू असून नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोका पातळीवर वाहत होती.सकाळी नऊ वाजल्यानंतर पाणी पातळी कमी होऊन ती सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. चिपळूणातील वशिष्ठी नदी,संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी,लांजा तालुक्यातील काजळी नदी,राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळीवर वाहत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
>> विजय जोशी सन 1983 व 89 साली त्यावेळच्या बिलोली, देगलूर व धर्माबाद या तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि पोचमपाड अर्थात...
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल
कापसाला कीड, सोयाबीनवर ‘उंट अळी’चा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर
वाशीला जे गुलाल उधळत होते त्यांना फडणवीसांनी साधं चर्चेतही घेतलं नाही, संजय राऊत यांचा टोला
धोकादायक सभा अपार्टमेंट खचली; नालासोपाऱ्यातील 40 कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले