राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागता, पण अनुराग ठाकूर यांच्याकडून का नाही? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल

राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागता, पण अनुराग ठाकूर यांच्याकडून का नाही? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल

अलीकडेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरीचा आरोप केला होता. यावर आज पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोग आणि मतदार यादीबाबत त्यांनी (राहुल गांधी) केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले. तसेच ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना सात दिवसांच्या आत आपल्या दाव्यांचा पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे किंवा संपूर्ण देशाची माफी मागण्याचे आव्हान केले आहे. यावर आता काँग्रेसने निवडणूक आयोगाला प्रत्युत्तर देत सवाल विचारला आहे की, तुम्ही राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागता, पण अनुराग ठाकूर यांच्याकडून का नाही?

याबद्दल बोलताना काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले आहेत की, “देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली, पण त्यांचे शब्द आणि त्यांची स्क्रिप्ट भाजपची होती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी आणि एसआयआरबद्दल अनेक प्रश्न विचारले, पण तुम्ही उत्तर दिले नाही. निवडणूक आयोगाने ज्यांना मृत घोषित केले ते लोक राहुल गांधींसोबत चहा पीत होते.”

निवडणूक आयोगाला विचारले दोन प्रश्न

जर सीसीटीव्ही फुटेज गोपनीयतेचे उल्लंघन करत असेल, तर सीसीटीव्ही का असावेत? तुम्ही राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागता, पण अनुराग ठाकूर यांच्याकडून का नाही? हे दोन प्रश्न त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला विचारले आहेत. पवन खेरा म्हणाले की, ज्ञानेश कुमार गुप्ता जी, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून लोकशाहीची हत्या करणारे आम्ही नाही तर, नरेंद्र मोदी आहोत. आमची विनंती आहे की, या हत्येत सहभागी होऊ नका.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;