राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागता, पण अनुराग ठाकूर यांच्याकडून का नाही? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल

राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागता, पण अनुराग ठाकूर यांच्याकडून का नाही? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल

अलीकडेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरीचा आरोप केला होता. यावर आज पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोग आणि मतदार यादीबाबत त्यांनी (राहुल गांधी) केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले. तसेच ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना सात दिवसांच्या आत आपल्या दाव्यांचा पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे किंवा संपूर्ण देशाची माफी मागण्याचे आव्हान केले आहे. यावर आता काँग्रेसने निवडणूक आयोगाला प्रत्युत्तर देत सवाल विचारला आहे की, तुम्ही राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागता, पण अनुराग ठाकूर यांच्याकडून का नाही?

याबद्दल बोलताना काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले आहेत की, “देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली, पण त्यांचे शब्द आणि त्यांची स्क्रिप्ट भाजपची होती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी आणि एसआयआरबद्दल अनेक प्रश्न विचारले, पण तुम्ही उत्तर दिले नाही. निवडणूक आयोगाने ज्यांना मृत घोषित केले ते लोक राहुल गांधींसोबत चहा पीत होते.”

निवडणूक आयोगाला विचारले दोन प्रश्न

जर सीसीटीव्ही फुटेज गोपनीयतेचे उल्लंघन करत असेल, तर सीसीटीव्ही का असावेत? तुम्ही राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागता, पण अनुराग ठाकूर यांच्याकडून का नाही? हे दोन प्रश्न त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला विचारले आहेत. पवन खेरा म्हणाले की, ज्ञानेश कुमार गुप्ता जी, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून लोकशाहीची हत्या करणारे आम्ही नाही तर, नरेंद्र मोदी आहोत. आमची विनंती आहे की, या हत्येत सहभागी होऊ नका.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या! बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यावर सरकार अद्याप कोणताही तोडगा काढू शकलेले नाही....
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?
विज्ञान रंजन – डौलदार लाल फूल!