महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी नवीन मतदार निर्माण केले, राहुल गांधी यांची टीका

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी नवीन मतदार निर्माण केले, राहुल गांधी यांची टीका

देशात संघ आणि भाजप संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तसेच महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी नवे मतदार निर्माण केले असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.

बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हिंदुस्थानात संघ आणि भाजप संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजप जिंकतात. महाराष्ट्रातील सर्व ओपिनियन पोल्समध्ये इंडिया आघाडीचा विजय होईल असे भाकीत होते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आमचा विजय होतो. विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होतो. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी नवे मतदार निर्माण केले, हे आम्ही शोधून काढले की असे राहुल गांधी म्हणाले.

तसेच त्यांची कटकारस्थानं अशी आहेत की बिहार विधानसभा निवडणुकीत नवे मतदार वाढवून चोरी करतील, पण बिहारची जनता हे होऊ देणार नाही. आधी देशाला माहित नव्हते की मतांची चोरी कशी होते, पण आम्ही पत्रकार परिषदेत दाखवून दिले की चोरी कशी होते. भाजप अब्जाधीशांसोबत सरकार चालवतं. तुमचे मत चोरले जाते आणि तुमचा सगळा पैसा 5 ते 6 अब्जाधीशांना दिला जातो. आम्ही लोकसभेत 50 टक्के आरक्षणाची भिंत तोडण्याची मागणी केली, पण भाजप आणि नरेंद्र मोदींनी दबावाखाली जात निहाय जनगणना करू असे म्हटले. पण ते ते योग्य प्रकारे करणार नाहीत. मात्र आम्ही सत्तेत आलो तर तसे करणार आणि मतांची चोरीही थांबवू असेही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;