महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी नवीन मतदार निर्माण केले, राहुल गांधी यांची टीका

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी नवीन मतदार निर्माण केले, राहुल गांधी यांची टीका

देशात संघ आणि भाजप संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तसेच महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी नवे मतदार निर्माण केले असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.

बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हिंदुस्थानात संघ आणि भाजप संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजप जिंकतात. महाराष्ट्रातील सर्व ओपिनियन पोल्समध्ये इंडिया आघाडीचा विजय होईल असे भाकीत होते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आमचा विजय होतो. विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होतो. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी नवे मतदार निर्माण केले, हे आम्ही शोधून काढले की असे राहुल गांधी म्हणाले.

तसेच त्यांची कटकारस्थानं अशी आहेत की बिहार विधानसभा निवडणुकीत नवे मतदार वाढवून चोरी करतील, पण बिहारची जनता हे होऊ देणार नाही. आधी देशाला माहित नव्हते की मतांची चोरी कशी होते, पण आम्ही पत्रकार परिषदेत दाखवून दिले की चोरी कशी होते. भाजप अब्जाधीशांसोबत सरकार चालवतं. तुमचे मत चोरले जाते आणि तुमचा सगळा पैसा 5 ते 6 अब्जाधीशांना दिला जातो. आम्ही लोकसभेत 50 टक्के आरक्षणाची भिंत तोडण्याची मागणी केली, पण भाजप आणि नरेंद्र मोदींनी दबावाखाली जात निहाय जनगणना करू असे म्हटले. पण ते ते योग्य प्रकारे करणार नाहीत. मात्र आम्ही सत्तेत आलो तर तसे करणार आणि मतांची चोरीही थांबवू असेही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 01 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 01 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस...
बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?