जम्मू कश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात ढगफुटी, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

जम्मू कश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात ढगफुटी, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. किश्तवाडमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर आता कठुआ जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. रविवारी झालेल्या या ढगफुटीमुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर माहिती देताना सांगितले की कठुआतील ढगफुटीच्या घटनेबाबत त्यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू असून एनडीआरएफच्या टीम्सही घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

अमित शहा यांनी या घटनेबाबत मोदी सरकारकडून शक्य ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

कठुआ जिल्ह्यातील घाटी आणि जंगलोत या गावांमध्ये ढगफुटी झाल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या पुराच्या लाटेत अनेक घरं कोसळली आहेत. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, इतकेच नव्हे तर कठुआ पोलिस ठाणेसुद्धा मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की राजबाग परिसरातील जॉड घाटी गावातही ढगफुटी झाली असून त्यामुळे गावाचा संपर्क इतर भागांपासून तुटला आहे. सध्या पोलिस व एसडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी उपस्थित आहेत आणि मदत व बचावकार्य सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या! बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यावर सरकार अद्याप कोणताही तोडगा काढू शकलेले नाही....
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?
विज्ञान रंजन – डौलदार लाल फूल!