मतदार यादीत घोटाळे करणाऱ्यांवर FIR दाखल व्हावी, निवडणूक कर्मचाऱ्यांनी भाजपच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊ नये – अखिलेश यादव

मतदार यादीत घोटाळे करणाऱ्यांवर FIR दाखल व्हावी, निवडणूक कर्मचाऱ्यांनी भाजपच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊ नये – अखिलेश यादव

मतदार यादीत घोटाळे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी भाजपच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊ नये, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर टीका करत ते असे म्हणाले आहेत.

X वर एक पोस्ट करत अखिलेश यादव म्हणाले आहेत की, “मतदार यादीत घोटाळे करणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांपासून ते बूथ स्तरावरील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांवर कठोर कारवाई होईल. अशा गैरप्रकारांमध्ये सामील असलेल्यांविरुद्ध एफआयआर दाखल होईल, त्यांना निलंबन आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. याशिवाय असे कर्मचारी आपल्या विभागात, कुटुंबात आणि समाजात देशाशी विश्वासघात करणारे म्हणून दोषी ठरतील.”

अखिलेश यादव यांनी पुढे म्हटले की, “निवडणुकीत हेराफेरी करणारे भाजप नेते आपले हेतू साध्य झाल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांना ओळखणारही नाहीत, त्यांना वाचवणे तर दूरच.” त्यांनी भाजपवर आरोप केला की, भाजप आपल्याच नेत्यांविरुद्ध बुद्धिबळाच्या खेळी खेळत राहते, तेव्हा इतरांचे काय? भाजपच्या गैरप्रकारांमध्ये सहभागी होऊन कोणताही गुन्हा करण्यापूर्वी सावध व्हावे, कारण भाजपा कुणाचीही नाही.” त्यांनी शेवटी म्हटले की, भाजप गेल्यास खरी सरकार येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या! बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यावर सरकार अद्याप कोणताही तोडगा काढू शकलेले नाही....
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?
विज्ञान रंजन – डौलदार लाल फूल!