सह्याद्री मल्टिसिटी फसवणूक प्रकरणी, चेअरमनसह दोघांना अटक

सह्याद्री मल्टिसिटी फसवणूक प्रकरणी, चेअरमनसह दोघांना अटक

सह्याद्री मल्टिसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या फसवणूकप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरात (वय 35, रा. सावेडी, अहिल्यानगर) व दरेवाडी शाखेचा मॅनेजर दिलीप तात्याभाऊ कोरडे (वय 35, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना दि. 19 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सह्याद्री मल्टिसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या चेअरमनसह 13 व्यक्तींनी मिळून 18 जणांची सुमारे 66 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत प्रमोद राजेंद्र साठे (वय 41, रा. नारायणडोह, ता. अहिल्यानगर) यांनी 9 जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख तपास करीत आहेत. पोलिसांनी या गुह्यात आतापर्यंत 160 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविले असून, फसवणुकीचा आकडा 3 कोटी 83 लाख 55 हजार 496 रुपयांवर गेला आहे. चेअरमन थोरात व मॅनेजर कोरडे यांना शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात यापूर्वी अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. 13) ताब्यात घेत अटक केली.

160 जणांचे 3.83 कोटी अडकले

भिंगार ठाण्यात 9 जूनला फिर्याद दाखल झाली, तेव्हा 18 व्यक्तींची 66 लाख रुपये फसवणूक झाल्याचा उल्लेख होता. मात्र, हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी 160 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवून घेतले. यामुळे फसवणुकीची रक्कम वाढली असून, ती 3 कोटी 83 लाख 55 हजार 496 रुपये झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या! बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यावर सरकार अद्याप कोणताही तोडगा काढू शकलेले नाही....
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?
विज्ञान रंजन – डौलदार लाल फूल!