महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

एनडीएने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याबाबत माहिती दिली.

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे या पदासाठी निवडणूक होत आहे. इंडिया आघाडीनेदेखील या निवडणुकीत उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले आहेत. सत्ताधारी व विरोधी गोटांत गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरू होती. सत्ताधारी एनडीएने राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आता इंडिया आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

राधाकृष्णन हे गेल्या चार दशकांपासून सार्वजनिक जीवनात सक्रिय असून ते दोन वेळा कोइम्बतूरमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. तामीळनाडू भाजपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मागील अडीच वर्षांपासून ते राज्यपालपदी आहेत. सुरुवातीला त्यांची नियुक्ती झारखंडच्या राज्यपालपदी झाली होती. तेलंगणा व पुद्दुचेरीच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता.

राजनाथ यांचा खरगेंना फोन

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्हाला विरोधकांच्या सहकार्याची गरज आहे. आम्ही विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहोत. सर्व विरोधकांशी चर्चा केली जाईल, असे जेपी नड्डा म्हणाले. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करून पाठिंबा मागितला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या! बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यावर सरकार अद्याप कोणताही तोडगा काढू शकलेले नाही....
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?
विज्ञान रंजन – डौलदार लाल फूल!