भरपावसात काळबादेवीतील पाटीलवाडी,कदमवाडीत पाच दिवस पाणीटंचाई
रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या पाटीलवाडी आणि कदमवाडीत गेले पाणीपुरवठा झालेला नाही.या दोन्ही वाडीतील ग्रामस्था संतापले आहेत.
जलस्वराज्य योजनेतून या गावात नळपाणी योजना सुरू करण्यात आली आहे.मात्र पाटीलवाडी आणि कदमवाडीतील ग्रामस्थांना अनेकवेळा पाण्यापासून वंचित राहावे लागते.भरपावसात गेले पाच दिवस पाटीलवाडी आणि कदमवाडीत पाणी पुरवठा झालेला नाही.श्रावण महिन्यातच पाण्याची बोंब झाल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.काळबादेवी ग्रामपंचायतीच गावातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List