Air India Flight Crash तु इंजिन कटऑफ का केलंस? पायलटचं अखेरचं संभाषण आलं समोर
अहमदाबाहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान 12 जून रोजी उड्डाणाच्या काही सेकंदातच कोसळले. या अपघातात विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी बचावला होता. या अपघाताने संपूर्ण देश हादरला होता.
दरम्यान या अपघाताच्या महिनाभरानंतर एक प्राथमिक अहवाल आला आहे. त्यात कॉकपिटमधील पायलटचे संभाषण रेकॉर्ड झाले आहे. त्या रेकॉर्डिंगनुसार विमान कोसळण्याच्या काही सेकंद आधी एका पायलटने दुसऱ्या पायलटला ‘तु इंजिन कटऑफ का केलंस? असं विचारतो. त्यावर दुसरा पायलट मी काहीही केलेलं नाही असं सांगतो. या संभाषणानंतर काही सेकंदातच विमान कोसळते. दोन्ही पायलट्समधील हे संभाषणाचा उल्लेख प्राथमिक चौकशीच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List