राजकीय हेतूने कारवाई, ईडीच्या आरोपपत्रावर रोहित पवार यांची टीका

राजकीय हेतूने कारवाई, ईडीच्या आरोपपत्रावर रोहित पवार यांची टीका

ईडीने राजकीय हेतूने विरोधात कारवाई होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी आरोपपत्र दाखल करत ईडीने रोहित पवार यांच्यावर मनी लाँडरिंग आरोप केला. मात्र पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दखल करून ही ईडीकडून आरोप पात्र दाखल करण्यात आलं आहे, मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीने कारखाने विकल्याचा आरोप ईडीकडून आरोपपत्रात करण्यात आला आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना रोहित पवार असं म्हणाले आहेत.

आज पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार म्हणाले आहेत की, “50.2 कोटी रुपयांना बारामती अ‍ॅग्रोने हे टेंडर घेतलं. 100 लोकांची नावे यात घेतली होती. यात अनेक लोक होती. ईडीने जी एफआयआर दाखल केली यात 97 लोकांची नावे आहेत. नाबार्डने जो रिपोर्ट केला होता, त्यात माझ्या एकट्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न ईडीच्या माध्यमातून झाला. हा प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातूनच झाला आहे.” ही लढाई आपण जिंकणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वैद्यकीय पिंजऱ्यामध्ये उपचार करतेवेळी टी-5 या वाघाने प्राणीरक्षकावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या रक्षकाने...
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर, शिलाँग कोर्टाचा निर्णय
Pune News – बारामती पालखी महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
IND vs ENG 3rd Test – टीम इंडियाची घोडदौड 387 धावांवर थांबली, तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त; इंग्लंडने घेतली आघाडी
Baloch Army Attack – बलूच सैन्याच्या हल्ल्यात 50 पाकिस्तानी सैनिक ठार, बीएलएफचा दावा
Jammu Kashmir – एसयूव्ही कार 600 फूट दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
Ratnagiri News – पळवून लावलं तरी बिबट्या गुरांच्या गोठ्यातच येऊन बसायचा, अखेर वनविभागाने केले जेरबंद