Baloch Army Attack – बलूच सैन्याच्या हल्ल्यात 50 पाकिस्तानी सैनिक ठार, बीएलएफचा दावा

Baloch Army Attack – बलूच सैन्याच्या हल्ल्यात 50 पाकिस्तानी सैनिक ठार, बीएलएफचा दावा

पाकिस्तानी सैन्याविरुद्ध बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) ने सुरु केलेली तीन दिवसांची ऑपरेशन बीएएम मोहीम संपली आहे. या ऑपरेशनदरम्यान पाकिस्तानी सैन्याच्या 84 तळांवर हल्ला करण्यात आला असून किमान 50 सैनिक ठार झाल्याचा दावा बीएलएफने केला आहे. या हल्ल्यात 51 हून अधिक गंभीर जखमी झाले.

बीएलएफच्या दाव्यानुसार, पाकिस्तानी सैन्याव्यतिरिक्त, बीएलएफने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था मिलिटरी इंटेलिजेंस (एमआय) आणि आयएसआयच्या 9 एजंटना देखील हल्ल्यात ठार केले. ऑपरेशन बीएएम दरम्यान, बलुचिस्तानच्या सैनिकांनी पाकिस्तानातील सात मोबाईल टॉवर आणि त्यांच्या यंत्रसामग्रीला आग लावली. तसेच पाकिस्तानी सैन्याच्या कारवाया थांबवण्यासाठी 22 मोक्याच्या ठिकाणी तात्पुरते चेकपोस्ट उभारण्यात आले.

सुमारे 72 तास चाललेल्या ऑपरेशन बीएएममध्ये बीएलएफने 84 हल्ल्यांपैकी 30 हून अधिक हल्ले पाकिस्तानी सैन्य आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर केले, तर दोन हल्ले पाकिस्तानी गुप्तचर संस्थांवर करण्यात आले. तसेच, लेव्ही चेकपोस्टवर चार आणि पोलिस चौक्यांवर चार हल्ले करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा ‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा
उसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला असतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. उन्हाळ्यात तर आवर्जून लोकं कोल्ड्रींक्सपेक्षा उसाच्या रसाला...
आधी मसाला स्प्रे मारला मग चाकूने केले वार, त्यानंतर…; पतीकडून अभिनेत्रीला जीवेमारण्याचा प्रयत्न
बिहारमधील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; आढळून आले नेपाळ, म्यानमाग, बांगलादेशचे नागरिक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा, मोठा पडदा गाजवणारे दिग्गज खलनायक कोटा श्रीनिवास राव यांचं निधन
मिंधे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी लावा, संजय राऊत यांची फडणवीसांकडे मागणी
मराठी बोलणार नाही, मला मारून टाकलं तरी चालेल! प्रसिद्ध अभिनेत्याची मुजोरी
लॉर्ड्सवर शेवटच्या षटकात हायव्हॉल्टेज ड्रामा; शुभमन गिलचा रुद्रावतार, सिराजमधला DSP जागा झाला; नेमकं काय घडलं?