महाराष्ट्रात जनादेश चोरला, आता बिहारची पाळी, राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल

महाराष्ट्रात जनादेश चोरला, आता बिहारची पाळी, राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी बिहारमधील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जनादेश चोरीला गेल्याचा दावा करत, आता बिहारमध्येही असाच कट रचला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या फेरतपासणी प्रक्रियेविरोधात इंडिया आघाडीने आयोजित केलेल्या ‘बिहार बंद’ आंदोलनात ते बोलत होते.

राहुल गांधी यांनी पटनामध्ये आयकर चौकापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पाटण्यातील महात्मा गांधी सेतूवर टायर जाळून रस्ता अडवला, तसेच सचीवालाय हॉल्ट रेल्वे स्थानकावर रेल्वे वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “महाराष्ट्रात जनादेश चोरीला गेला. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळाले होते, पण काही महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला. डेटा विश्लेषणातून कळले की, तिथे एक कोटी नवीन मतदार जोडले गेले, जे एकूण मतदारांच्या 10 टक्के होते. आश्चर्याची बाब म्हणजे, हे सर्व नवीन मत भाजपला गेले. आता बिहारमध्येही असाच प्रकार घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पंढरपूर कॉरिडॉर लपूनछपून करणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर कॉरिडॉर लपूनछपून करणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कॉरिडॉरबाबत सर्वांना विश्वासात घेतले जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी संभाव्य बाधितांशी चर्चा केली आहे. प्रश्नावली दिली आहे, माहिती घेतली आहे, काहीही...
महू धरणाच्या भिंतीवर काटेरी जंगलाचा विळखा, 30 वर्षांपासून धरणाचे काम प्रलंबित
श्रीगोंद्यातील जवानाचा मृतदेह कोलकात्यात रेल्वेमार्गाशेजारी आढळला
कोल्हापूर महापालिकेत ठेकेदाराचा घोटाळा; तत्कालीन शहर, उप आणि कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस
गुजरातच्या धर्तीवर माथेरानमधील हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन करा! 2 आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळणार
तुम्ही शिकलेल्या आहात, कमावून खा! पत्नीने मागितली 12 कोटींची पोटगी, सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला