नितीश कुमार आणि भाजपने बिहारला गुन्ह्यांची राजधानी बनवली, राहुल गांधी यांची टीका

नितीश कुमार आणि भाजपने बिहारला गुन्ह्यांची राजधानी बनवली, राहुल गांधी यांची टीका

बिहारमध्ये एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावरून नितीश कुमार आणि भाजपने बिहारला गुन्ह्यांची राजधानी बनवली अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी म्हणाले की, पाटण्यात व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यामुळे सिद्ध झाले आहे की भाजप आणि नितीश कुमार यांनी मिळून बिहारला हिंदुस्थानची क्राईम कॅपिटल बनवलं आहे.

तसेच बिहारमध्ये चोऱ्या माऱ्या, गोळीबार आणि हत्या ही सामान्य बाब झाली आहे. गुन्हेगारी न्यु नॉर्मल झाले आहे आणि सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बिहारच्या बंधू आणि भगिनींनो हा अन्याय आपण आता सहन नाही करू शकत. जे सरकार तुमच्या मुलांची रक्षा नाही करू शकतो ते तुमच्या भविष्याची जबाबदारही नाही घेऊ शकत.

आता वेळ आहे नवा बिहार घडवण्याची, जिथे भिती नव्हे तर प्रगती असणार. या वेळी मत फक्त सरकार बदलण्यासाठी नव्हे तर बिहार वाचवण्यासाठी असणार आहे असेही राहुल गांधी म्हणाले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश
वाहतुकीच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारा माझा नातेवाईक असला तरी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे, असा इशारा...
बेळगावातील कन्नड सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार!
युरोपीय युनियन, मेक्सिकोवर टेरिफ बॉम्ब डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, 1 ऑगस्टपासून होणार लागू
रंगभूमी- चिंतन नियतीवादाचे
कृषिभान- वाटचाल कुपोषणाकडून उपोषणाकडे!
माधुरीला गुजरातला पाठवण्यास विरोध, हायकोर्टाने राखून ठेवला निकाल; कोल्हापुरातील जैन संस्थेच्या हत्तीणीच्या स्थलांतराला आव्हान
विशेष – ‘उत्तराधिकारी’ निवडीचे भूराजकीय पडसाद!