नितीश कुमार आणि भाजपने बिहारला गुन्ह्यांची राजधानी बनवली, राहुल गांधी यांची टीका

नितीश कुमार आणि भाजपने बिहारला गुन्ह्यांची राजधानी बनवली, राहुल गांधी यांची टीका

बिहारमध्ये एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावरून नितीश कुमार आणि भाजपने बिहारला गुन्ह्यांची राजधानी बनवली अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी म्हणाले की, पाटण्यात व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यामुळे सिद्ध झाले आहे की भाजप आणि नितीश कुमार यांनी मिळून बिहारला हिंदुस्थानची क्राईम कॅपिटल बनवलं आहे.

तसेच बिहारमध्ये चोऱ्या माऱ्या, गोळीबार आणि हत्या ही सामान्य बाब झाली आहे. गुन्हेगारी न्यु नॉर्मल झाले आहे आणि सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बिहारच्या बंधू आणि भगिनींनो हा अन्याय आपण आता सहन नाही करू शकत. जे सरकार तुमच्या मुलांची रक्षा नाही करू शकतो ते तुमच्या भविष्याची जबाबदारही नाही घेऊ शकत.

आता वेळ आहे नवा बिहार घडवण्याची, जिथे भिती नव्हे तर प्रगती असणार. या वेळी मत फक्त सरकार बदलण्यासाठी नव्हे तर बिहार वाचवण्यासाठी असणार आहे असेही राहुल गांधी म्हणाले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;